शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे झाला विजयचा जन्म, नव्हे दुसऱ्या दुग्धक्रांतीचाच जन्म

By अोंकार करंबेळकर | Updated: August 23, 2017 16:52 IST

भारतात आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन- कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं.

ठळक मुद्देपठाण यांच्या फर्ममधील रतन नावाच्या गीर जातीच्या गायीचे अफलित अंडबिज या प्रयोगासाठी वापरण्यात आले. भारतात आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं

मुंबई, दि.23- रविवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एक आनंदाची बातमी घेऊन आली. भारतात आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन- कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानाच्या मदतीने विजय नावाचे वासरू रविवारी पहाटे जन्माला आलं. विजयच्या रुपाने आपल्या देशाची दुसऱ्या दुग्धक्रांतीकडे पावलं पडत आहेत.

डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या जे. के. ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. श्याम झंवर, डॉ. रमाकांत कौशिक आणि त्यांच्या टीमने आयव्हीएफ पद्धती आर. जे. पठाण व माजिदखान पठाण यांच्या रचना खिल्लार फर्मवर यशस्वी करुन दाखवली आहे. या तंत्रज्ञानामुळे जन्माला आलेल्या गीर जातीच्या या वासराचे नाव विजय असे ठेवण्यात आले आहे. डॉ. लक्ष्मणराव असबे, मिलिंद देवल, अप्पासो पाटील, डॉ. संजय शिंदे, जुबेर पठाण या सर्वांच्या मदतीने हा प्रयोग करण्यात आला. 

इंजिनिअर आणि देशी गाय

कृत्रिम गर्भधारणेचा उपयोग करुन भारतामध्ये हर्षा चावडा या मुलीचा 1986 साली जन्म झाला. आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरण्याची भारतातील ही पहिलीच वेळ होती. डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये यशस्वी करुन दाखवले होते. आता हेच तंत्रज्ञान दुग्धउत्पादन वाढवण्यासाठी आणि देशी गोवंश वाचवण्यासाठी गायींच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते एक आयुष्यभरामध्ये (सरासरी 15 वर्षे) 10 वासरांना जन्म देऊ शकते. पण आयव्हीएफमुऴे एका वर्षात 20 वासरांना जन्म दिला जाऊ शकतो म्हणजेच एका आयुष्यभरात गाय 200 वासरांना जन्म देऊ शकेल.

कशी करण्यात आली गायीची कृत्रिम गर्भधारणा?

पठाण यांच्या फर्ममधील रतन नावाच्या गीर जातीच्या गायीचे अफलित अंडबिज या प्रयोगासाठी वापरण्यात आले. हे बिज प्रथम इन्क्युबेटरमध्ये काही तासांसाठी ठेवण्यात आले त्यानंतर गीर जातीच्याच नराच्या वीर्याशी त्याचा संयोग घडवून आणण्यात आला. 7 दिवसांनंतर त्याचे रुपांतर प्राथमिक अवस्थेतील गर्भामध्ये झाले. हा गर्भ त्यानंतर दुसऱ्या मादीमध्ये ठेवण्यात आला. ही सगळी प्रक्रिया नोव्हेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती. रतनप्रमाणे इतर तीन गायींची बिजेही कृत्रिम गर्भधारणेसाठी गोळा करण्यात आली होती, त्यामधील एक गाय गीर व दोन खिलार गायी होत्या. लवकरच या गायीही प्रसूत होण्याची शक्यता आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचे मानकरी

रजाक जब्बार पठाण यांना गोवंशवृद्धी आणि खिल्लाराची पैदास यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या लोकमत समुहाद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गायींवर आईसारखी माया करतानाच गाय हा एक उपयुक्त पशू असल्याचे तत्वज्ञान कृतीतून सिद्ध करणारा माणूस. गाय कसायाघरी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दारी जाईल, यासाठी त्यांनी भगिरथ प्रयत्न केले आहेत. उत्तम जातिवंत देशी गायींच्या पैदाशीसाठी कार्यरत. आदर्श मुस्लीम गोपालक आणि अकाली वैधव्य आलेल्या शेतकरी महिलांना आधार देणारा भाऊ अशी रज्जाक पठाण यांची ओळख आहे.जातीवंत देशी गोधनाच्या निर्मितीची गरज ओळखून गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या गोठ्यात अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम अखंड चालू आहे. गेल्या दोन दशकांच्या प्रयत्नातून २४ तासात १२ लिटर दुध देणारी खिल्लार व २८ लिटर दुध देणार गीर गायीची प्रजाती सिद्ध केल्या आहेत.  जातीवंत जनावरांच्या पैदाशीसाठी उत्कृष्ट वळूंचीही पैदास तेथे होते. त्याचा लाभ इतर गोशाळांनाही झाला आहे. १५० पेक्षा जास्त गायी वासरांच्या या गोतावळ्यात  बैलपोळा रमजान पेक्षाही जास्त उत्साहाने साजरा होतो. येथे ६५० अकाली शेतकरी विधवा महिलांची भाऊबीज साजरी केली जाते. त्यांच्या ७७४ मुला-मुलींचे मुलांच्या  शिक्षणाचा पूर्ण खर्च केला जातो. दिवसाकाठी निदान ४० ते ५० शेतकरी व गोपालकांना दूध,शेण, गोमूत्र यांचे महत्व पटवून देणारा प्रशिक्षण कार्यक्रम अव्याहत सुरू असतो. आजवर १२५ शेतकऱ्यांना देशी गायींचा पुरवठा त्यांनी केला आहे. तसेच १२ एकरांची बाग सहा महिने गायी-गुरांना चरण्यासाठी खुली केली. त्यातून गुरांना आयुर्वेदिक वनस्पतींचा आहार आणि त्याच गायींचे शेण व गोमूत्र यांच्यापासून जीवामृत व दशपर्णी अर्क बनवून पिकांसाठी वापर त्यांनी केला आहे.

टॅग्स :Indiaभारत