शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:58 IST

सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे..

ठळक मुद्देनारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन.

पुणे : पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडून सगळे नव्याने उभे करायला किमान पाच-सहा वर्षे लागतील. अशावेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे, असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन-तीन महिने पुढे ढकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी एस.एम.जोशी सभागृह येथे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते.निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, तसेच सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. संजय चोरडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महानोर म्हणाले, ‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन. १९५६ संयुक्त महाराष्ट्राची निवडणुकीच्या दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या माध्यमातून मला नारायण सुर्वे पहिल्यांदा भेटले. त्या निवडणुकीतील एक पान अमर शेख आणि नारायण सुर्वे यांचे आहे. सुर्वेंनी जगण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न कवितेतून मांडला. घाम गाळणा-या दु:खी माणसाचा हुंकार त्यांनी ठोसपणे पहिल्यांदा मांडला.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. --------------काय म्हणाले महानोर?- १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या निवणुकीमध्ये सभा, संमेलने रंगत होती, दिग्गजांची उपस्थिती असायची. एका सभेला जवाहरलाल नेहरु स्वत: उपस्थित होते. त्यांनी रशिया, चीनसंबंधी आंतरराष्ट्रीय प्रश्न, भाक्रानांगल याबाबत भाष्य केले. त्यावेळी समाजवादी पक्षातर्फे कोणी निवडणूक लढवायला तयार नव्हते. एका तरुणाला काँग्रेसविरोधात उभे करण्यात आले. शाहीर अमर शेख यांनी सुर्वेंच्या कवितेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारात वास्तव मांडले. त्यावेळी भाकरी महत्वाची की भाक्रानांगल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.- मला उजवा-डावा असा भेद समजतच नाही. तुकारामालाही त्यातील काही समजत नव्हते. त्यांनी केवळ प्रेमाची शिकवण दिली. समाजाच्या भल्याचा विचार केला. डावे-उजवे असे मतभेद नक्की असतील. पण देशात इतिहास घडवणारा माणूस म्हणून नेहरुंचा मोठेपणा विसरता येणार नाही. राजकारणात तारतम्य बाळगून कसे चालले पाहिजे, हे त्या काळातील लोकांकडून आजच्या राजकारण्यांनी समजून घेतले पाहिज.े- भ्रष्टाचार ना करेंगे, ना करने देंगे हे कोणत्या आत्मविश्वासाने बोलले जाते? महाराष्ट्र आणि देशात अजूनही भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे.- काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला तेव्हा माणसेच मिळत नव्हती. परिस्थिती कशी बदलते, ते आता कळते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.- राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी हे लाजिरवाणे होते. कविता, साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. यातून काय साध्य झाले? साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfloodपूरElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस