शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:58 IST

सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे..

ठळक मुद्देनारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन.

पुणे : पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडून सगळे नव्याने उभे करायला किमान पाच-सहा वर्षे लागतील. अशावेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे, असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन-तीन महिने पुढे ढकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी एस.एम.जोशी सभागृह येथे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते.निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, तसेच सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. संजय चोरडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महानोर म्हणाले, ‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन. १९५६ संयुक्त महाराष्ट्राची निवडणुकीच्या दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या माध्यमातून मला नारायण सुर्वे पहिल्यांदा भेटले. त्या निवडणुकीतील एक पान अमर शेख आणि नारायण सुर्वे यांचे आहे. सुर्वेंनी जगण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न कवितेतून मांडला. घाम गाळणा-या दु:खी माणसाचा हुंकार त्यांनी ठोसपणे पहिल्यांदा मांडला.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. --------------काय म्हणाले महानोर?- १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या निवणुकीमध्ये सभा, संमेलने रंगत होती, दिग्गजांची उपस्थिती असायची. एका सभेला जवाहरलाल नेहरु स्वत: उपस्थित होते. त्यांनी रशिया, चीनसंबंधी आंतरराष्ट्रीय प्रश्न, भाक्रानांगल याबाबत भाष्य केले. त्यावेळी समाजवादी पक्षातर्फे कोणी निवडणूक लढवायला तयार नव्हते. एका तरुणाला काँग्रेसविरोधात उभे करण्यात आले. शाहीर अमर शेख यांनी सुर्वेंच्या कवितेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारात वास्तव मांडले. त्यावेळी भाकरी महत्वाची की भाक्रानांगल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.- मला उजवा-डावा असा भेद समजतच नाही. तुकारामालाही त्यातील काही समजत नव्हते. त्यांनी केवळ प्रेमाची शिकवण दिली. समाजाच्या भल्याचा विचार केला. डावे-उजवे असे मतभेद नक्की असतील. पण देशात इतिहास घडवणारा माणूस म्हणून नेहरुंचा मोठेपणा विसरता येणार नाही. राजकारणात तारतम्य बाळगून कसे चालले पाहिजे, हे त्या काळातील लोकांकडून आजच्या राजकारण्यांनी समजून घेतले पाहिज.े- भ्रष्टाचार ना करेंगे, ना करने देंगे हे कोणत्या आत्मविश्वासाने बोलले जाते? महाराष्ट्र आणि देशात अजूनही भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे.- काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला तेव्हा माणसेच मिळत नव्हती. परिस्थिती कशी बदलते, ते आता कळते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.- राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी हे लाजिरवाणे होते. कविता, साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. यातून काय साध्य झाले? साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfloodपूरElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस