शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

महिला दिनी ‘ती’ ठरली हुंडाबळीची शिकार, धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 07:12 IST

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली.

- मनीषा म्हात्रेमुंबई - कुटुंबियांच्या विरोधात जाऊन बबिताने प्रेमविवाह केला. मात्र, सासू-सासºयांना हुंडा देणारी सून हवी असल्यामुळे त्यांचाही या विवाहाला विरोध होता. लग्नाच्या काही दिवसांतच बबिताचा शारिरीक, मानसिक छळ सुरु झाला. ती चार महिन्याची गर्भवती राहिली. अशातच पती आणि सासºयाने ५० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी तिला मारहाण सुरुवात केली. यातून झालेल्या जखमांवर रुग्णालयात उपचार घेत असतानाच बबिताने महिला दिनी अखेरचा श्वास घेतला. एकविसाव्या शतकात मुंबईसारख्या शहरातही विवाहितेचा हुंड्यासाठी छळ होतोय ही धक्कादायक बाब आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली आकडेवारीही काहीशी बोलकी आहे. त्यामुळे महिला आपल्या राहत्या घरात तरी सुरक्षीत आहेत का, हाच सवाल येथे उपस्थित होतो. अशाच काहीशा मन हेलाऊन सोडणाºया गोष्टींचा हा आढावा...माटुंगा परिसरात आई, वडील आणि तीन भावंडासोबत २३ वर्षीय बबिता राहयची. तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन गेल्या वर्षी मे महिन्यात शेजारच्या राजेश सिध्दराम बोडा याच्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र, लग्नाच्या काही दिवसातच तिचा मानसिक, शारिरीक छळ सुरु झाला. माहेरून ५० हजार रुपये हुंडा घेऊन येण्यासाठी तिच्यामागे तगादा सुरु झाला. तिने याबाबत आई वडीलांना सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखिची असल्याने त्यांना पैसे देणे शक्य नव्हते. तरीही शक्य तितके पैसे देऊ, असे सांगत बबिताच्या आई वडीलांनीही तिच्या सासरच्या मंडळींकडून थोडा वेळ मागितला.मात्र, बबिताला मारहाण सुरुच राहिली.मारहाणीला कंटाळून २५ जानेवारीला बबिताने पतिबाबत शाहू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत राजेशला समज दिली.अशातच बबीता चार महिन्याची गर्भवती राहिली. मात्र, तो काही नमला नाही. महिला दिनी पहाटेच्या सुमारास हुंड्याच्या रक्केमवरुन त्याने वाद घातला आणि बबिताला बेदम मारहाण सुरु केली. राजेशने तिचा गळा आवळला. यामध्ये तिची शुद्ध हरपली. तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तिचा मत्यू झाला.याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हुंडाबळी कायद्याअंतर्गत हत्येचागुन्हा दाखल करुन पतीसहसासºयाला अटक केली आहे.मात्र, या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. कित्येक महिला दरदिवशी अशा प्रकारातील शिकार ठरतआहेत. त्यामुळे यावर रोख आणणे गरजेचे आहे.मांडवातच दिला नकारमालाडमध्ये राहणाºया १९ वर्षीय गीताचे कळव्यातील आशिष मोहीलाल गुप्ता (२२) सोबत लग्न ठरले. साखरपुडा पार पडल्यानंतर ६ मार्चला लग्नाची तारीख ठरली. मांडव सजला. सुखी संसाराचे स्वप्न रंगवून गीता मांडवात बसली. वडिलांनी जमापूंजी तसेच कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या.मंगळसूत्र घालण्यापूर्वीच सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार रुपयांचा हुंडा द्या, नाहीतर लग्न मोडले म्हणून समजा, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सासºयांचे पाय धरले. लग्न मोडू नका म्हणून विनंती केली. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी सुरु झाली.नवºयाच्या आईने त्यांच्याच कानशिलात लगावत तेथून निघून गेले. आणि अवघ्या ७० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी विवाह मोडला. गीताने हार न मानत मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार नवºयासह सासू-सासºयांना अटक करण्यात आली.वैचारिक क्रांतीहोणे गरजेचे....आजही हुंड्यासाठी महिलांचा बळी जातो ही खेदजनक आणि गंभीर बाब आहे. गेल्या ४३ वर्षापासून आम्ही या प्रथेविरुद्ध आवाज उचलत आहोत. कायद्यात कठोरता आहे. मात्र त्याबाबतचा धाक अद्याप त्यांच्यापर्यंत हवा तसा पोहचलेला नाही. आजही पैसे, फसवणूक, संशय यामुळे स्त्रीयांची छळवणूक होतच आहे. झटपट पैसा हवा म्हणूनच पालकच हुंड्याच्या माध्यमातून लग्नाचा घाट घालतात. कुठेतरी मुलीनेच हुंडा न घेणाºया जोडीदारालाच पसंती देणे गरजेचे आहे. लग्नानंतर अशी मागणी होत असेल तर तिने पोलिसांकडे धाव घ्यावी. याबाबत वैचारिक क्रांती होणे गरजेचे आहे.- आशा कुलकर्णी, महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, मुंबईसमुपदेशनातून मिळाले पुन्हा जगण्याचे बळउच्चशिक्षित आणि चांगल्या पगारवाला म्हणून कुटुंबियांनी थाटामाटात नेहाचा (नावात बदल) राकेशसोबत विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. त्यांना मुलगा झाला. अशात मुलगा सहा महिन्याचा असताना राकेशला परदेशात जाण्याचे वेड लागले. त्याने नेहाला माहेरून पैसे आणण्याची मागणी सुरु केली.तिने नकार देताच राकेशसह त्याच्या आई वडीलांकडून तिला मारहाण सुरु झाली. मात्र, ती पैसे न देण्यावर ठाम होती. मानसिक, शारिरीक अत्याचार सुरु झाले. छळाची परिसीमा म्हणजे तिचे केस कापून तिला विद्रूप केले गेले. शिवाय तिला वेडी ठरविण्याचाही प्रयत्न झाला. तिला मानसिक रुग्णाच्या रुग्णालयात भरती केले. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी नेहाला स्वत:कडे बोलावून घेतले.नेहाची परिस्थिती पाहून कुटुंबियांनाही धक्का बसला. नेहाला घेऊन तिचे मामा आशा कुलकर्णी यांच्याकडे घेऊन आले. तिला यातून बाहेर काढणे कठीण होते. बरेच दिवस तिचे समुपदेशन त्यांनी केले. सध्या ती एका रुग्णालयात परिचारीका म्हणून कामाला आहे, तर मुलगाही चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे. समुपदेशनामुळे तिला जगण्याची नवी दिशा मिळाली.

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू