शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

पक्ष संघटना वाढविणे हीच खरी श्रद्धांजली

By admin | Updated: February 18, 2015 23:57 IST

उदय भोसले : सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील यांना आदरांजली

सावंतवाडी : गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यात आर. आर. पाटील यांनी नक्षलवाद्यांना सुधारले. त्यांच्यातील विष बाजूला करून जिल्ह्यातील गरीब कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या निधनाने देशासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढविणे हीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. त्यांना सावंतवाडी तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी कार्यालयात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष उदय भोसले बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सत्यप्रकाश गावडे, उपतालुकाध्यक्ष अशोक पवार, सुरेश राऊळ, मंगलदास देसाई, गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, यशवंत जाधव, विजय कदम, भाई भाईप, सतीश नाईक, प्रसाद बर्गे, आदी उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन त्यांनी राजकारणात यश संपादन केले. यामुळे पैसा हाच पक्षामध्ये सर्वस्व नाही, हे आबांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले. गृहमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांनी एका दिवसात केल्या होत्या. गनिमी काव्याप्रमाणे त्यांची कामाची पद्धत होती. सामान्य माणसांच्या आलेल्या निवेदनातून तक्रारी अथवा अन्य कामे ते सहज करून सामान्य माणसाला न्याय देत असत. ते राष्ट्रवादीतील महत्त्वाचे रत्न होते, असे यावेळी सुरेश गवस यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले व्यक्तिमत्त्व घडवून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेतली. एसएससी परीक्षेदरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांची परिस्थितीही गरिबीची होती. यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वावर एसएससीचा टप्पा पूर्ण केला. खूप वाचन केले. जिल्हा परिषद मतदार संघावर ते बावीसाव्या वर्षी निवडून आले आणि तेथून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. विधानभवनातही हुशार असे व्यक्तिमत्त्व आबांचे होते, असे सत्यजित धारणकर यांनी सांगितले. आबा पाटील हे सर्वसामान्यांचे नेते होते. आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व याच्या जोरावर ते पुढे आले. त्यांच्या निधनाने सर्व सामाजिक संस्था हळहळल्या. संपूर्ण देशाची हानी झाली. त्यांना कधीही गर्व झाला नाही, असे यावेळी मंगलदास देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)