शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटना वाढविणे हीच खरी श्रद्धांजली

By admin | Updated: February 18, 2015 23:57 IST

उदय भोसले : सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून आर. आर. पाटील यांना आदरांजली

सावंतवाडी : गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यात आर. आर. पाटील यांनी नक्षलवाद्यांना सुधारले. त्यांच्यातील विष बाजूला करून जिल्ह्यातील गरीब कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या निधनाने देशासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढविणे हीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. त्यांना सावंतवाडी तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी कार्यालयात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष उदय भोसले बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सत्यप्रकाश गावडे, उपतालुकाध्यक्ष अशोक पवार, सुरेश राऊळ, मंगलदास देसाई, गुरुदत्त कामत, सत्यजित धारणकर, यशवंत जाधव, विजय कदम, भाई भाईप, सतीश नाईक, प्रसाद बर्गे, आदी उपस्थित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन त्यांनी राजकारणात यश संपादन केले. यामुळे पैसा हाच पक्षामध्ये सर्वस्व नाही, हे आबांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले. गृहमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांनी एका दिवसात केल्या होत्या. गनिमी काव्याप्रमाणे त्यांची कामाची पद्धत होती. सामान्य माणसांच्या आलेल्या निवेदनातून तक्रारी अथवा अन्य कामे ते सहज करून सामान्य माणसाला न्याय देत असत. ते राष्ट्रवादीतील महत्त्वाचे रत्न होते, असे यावेळी सुरेश गवस यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले व्यक्तिमत्त्व घडवून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेतली. एसएससी परीक्षेदरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांची परिस्थितीही गरिबीची होती. यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वावर एसएससीचा टप्पा पूर्ण केला. खूप वाचन केले. जिल्हा परिषद मतदार संघावर ते बावीसाव्या वर्षी निवडून आले आणि तेथून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. विधानभवनातही हुशार असे व्यक्तिमत्त्व आबांचे होते, असे सत्यजित धारणकर यांनी सांगितले. आबा पाटील हे सर्वसामान्यांचे नेते होते. आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व याच्या जोरावर ते पुढे आले. त्यांच्या निधनाने सर्व सामाजिक संस्था हळहळल्या. संपूर्ण देशाची हानी झाली. त्यांना कधीही गर्व झाला नाही, असे यावेळी मंगलदास देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)