शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राज्यांतर्गत राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठविणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 02:46 IST

उच्च न्यायालय; सरकारला विचार करण्याचे निर्देश

मुंबई : राज्याचे नागरिक असलेल्या मात्र विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगारांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठविणे शक्य आहे का, अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यावर विचार करण्याची सूचना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगार आणि वेठबिगारीच्या स्थितीबाबत चिंंता व्यक्त करीत न्या. आर. के. देशपांडे यांनी राज्य सरकारला ही सूचना केली.

जे कामगार राज्याचेच नागरिक आहेत, त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याबाबत विचार करावा. त्यामुळे प्रशासनावरील भार कमी होईल, असे न्यायालयाने म्हटले. प्रवास करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करा. त्यामुळे ते कोरोनाबाधित नाहीत, याची खात्री होईल. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात कोरोना पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी वेठबिगारी आणि स्थलांरितांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य पातळीवर समिती नेमण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. जिल्हा पातळीवरील समिती त्यांच्या जिल्ह्यात अडकलेले वेठबिगार व स्थलांतरितांच्या पाणी, अन्न, निवारा आणि अन्य सुविधांबाबतच्या तक्रारींची दखल घेईल, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

राज्याचेच निवासी परंतु मूळ गाव सोडून अन्य ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरितांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करा, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. ‘कोविड-१९ हा केवळ या देशापुरताच मर्यादित नाही. हा संसर्ग असून तो संपूर्ण जगात पसरला आहे,’ असेही न्यायालयाने म्हटले.काय म्हणाले न्यायालयकामगार व मजुरांचे आंतरराज्यीय स्थलांतर हा विषय केंद्र सरकारने राज्य सरकारशी सल्लामसलत करून हाताळण्याचा आहे आणि हेच आदरणीय पंतप्रधानांनी देशाला संबोधताना म्हटले, असे न्या. देशपांडे यांनी म्हटले. ‘काही अडकलेल्या कामगारांना निश्चितच समस्यांना सामोरे जावे लागत असेल. मात्र, सर्वेक्षण केल्याशिवाय आणि राज्य किंंवा केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतल्याशिवाय सकारात्मक निर्देश देणे शक्य नाही,’ असेही न्या. देशपांडे यांनी स्पष्ट केले. यावर पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र