शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

राज्यांतर्गत राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठविणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 02:46 IST

उच्च न्यायालय; सरकारला विचार करण्याचे निर्देश

मुंबई : राज्याचे नागरिक असलेल्या मात्र विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगारांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठविणे शक्य आहे का, अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यावर विचार करण्याची सूचना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगार आणि वेठबिगारीच्या स्थितीबाबत चिंंता व्यक्त करीत न्या. आर. के. देशपांडे यांनी राज्य सरकारला ही सूचना केली.

जे कामगार राज्याचेच नागरिक आहेत, त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याबाबत विचार करावा. त्यामुळे प्रशासनावरील भार कमी होईल, असे न्यायालयाने म्हटले. प्रवास करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करा. त्यामुळे ते कोरोनाबाधित नाहीत, याची खात्री होईल. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात कोरोना पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. त्यावर महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी वेठबिगारी आणि स्थलांरितांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य पातळीवर समिती नेमण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. जिल्हा पातळीवरील समिती त्यांच्या जिल्ह्यात अडकलेले वेठबिगार व स्थलांतरितांच्या पाणी, अन्न, निवारा आणि अन्य सुविधांबाबतच्या तक्रारींची दखल घेईल, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

राज्याचेच निवासी परंतु मूळ गाव सोडून अन्य ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरितांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करा, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. ‘कोविड-१९ हा केवळ या देशापुरताच मर्यादित नाही. हा संसर्ग असून तो संपूर्ण जगात पसरला आहे,’ असेही न्यायालयाने म्हटले.काय म्हणाले न्यायालयकामगार व मजुरांचे आंतरराज्यीय स्थलांतर हा विषय केंद्र सरकारने राज्य सरकारशी सल्लामसलत करून हाताळण्याचा आहे आणि हेच आदरणीय पंतप्रधानांनी देशाला संबोधताना म्हटले, असे न्या. देशपांडे यांनी म्हटले. ‘काही अडकलेल्या कामगारांना निश्चितच समस्यांना सामोरे जावे लागत असेल. मात्र, सर्वेक्षण केल्याशिवाय आणि राज्य किंंवा केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतल्याशिवाय सकारात्मक निर्देश देणे शक्य नाही,’ असेही न्या. देशपांडे यांनी स्पष्ट केले. यावर पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र