शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:53 IST

Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रामध्ये शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. तसेच राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या होत असलेल्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची हिंदी भाषेच्या सक्तीबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध आणि हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, या प्रश्नाला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणे योग्य नाही. पण पाचवीनंतर आपण हिंदी भाषा अनिवार्य करू शकतो. भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

तर ठाकरे बंधूंकडून होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत शरद पवार म्हणाले की, कोणीही सांगतो म्हणून आंदोलनात सहभागी होता येणार नाही. मुंबईत गेल्यावर मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ऐकून घेईन. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीhindiहिंदी