शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

यहाँ जीना हैं मुश्किल, मुंबई देशातलं सर्वांत महागडं शहर

By admin | Updated: June 25, 2017 06:37 IST

स्वप्नांचे शहर, मायानगरी अशा एक ना अनेक बिरुदावल्या मिळालेली भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे देशातील सर्वांत महागडं तर

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - स्वप्नांचे शहर, मायानगरी अशा एक ना अनेक बिरुदावल्या मिळालेली भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे देशातील सर्वांत महागडं तर जगातील 57 वे शहर असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये अनेक गोष्टींच्या दरामध्ये वाढ झाली असून, महागाई 4.81 टक्क्यांवरून 5.57 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मर्सर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे. या यादीत अंगोलाची राजधानी ल्युआंडा जगातील सर्वांत महागडे शहर ठरले आहे. दुसऱ्या स्थानावर हाँगकाँगचा क्रमांक लागतो. टोकियो, झ्युरिक आणि सिंगापूर ही शहरे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत दिल्ली 99 व्या क्रमांकावर आहे. 

मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते . यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे . हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे . या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे . तर चेन्नई (१३५), बंगळूरु(१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे . मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), डल्लास आणि पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६), आणि व्हिएना (७८) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे . चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत .जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थांना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठया प्रामाणात वाढ झाली आहे . वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे . टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठया प्रमाणात वाढले आहे.ट्युनिस (२०९), बिशकेक (२०८), कोपजे आणि विन्डोक (२०६), ब्लाटायर (२०५), बिलीसी (२०४), मॉन्टेरेरी(२०३), सॅराजेवो (२०२), कराची (२०१) आणि मिन्स्क (२००) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्व्हेक्षणात नमूद केले आहे . लुएन्डा या शहरानंतर हॉंगकॉंग (२), टोकियो (३), झ्युरिच (४), सिंगापूर (५) ही जगभरातील महागडी शहरे आहेत . याशिवाय सीऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे .या सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देताना मर्सरच्या भारतातील प्रमुख रुचिका पाल यांनी सांगितले की, २०१६ साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या तर भाड्याने घर घेऊन तात्पुरती स्वताची सोय करणा-यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली. असे रुचिका पाल यांनी सांगितले.देशातील शहरांची क्रमवारी-शहर २०१७-२०१६मुंबई ५७-८२नवी दिल्ली ९९-१३०चेन्नई १३५-१५८बंगळुरू १६६-१८०कोलकाता १८४-१९४