शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रिक्षा-टॅक्सीत टोल फ्री नंबर लावणे अनिवार्य - परिवहनमंत्री दिवाकर रावते  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 14:55 IST

रिक्षा आणि टॅक्सीवाले यांच्या मुजोरीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हा टॅक्सी आणि रिक्षामध्ये लावणे अनिवार्य करण्यात येणार असून या टोल फ्री नंबरची जास्तीत जास्त जाहिरात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.

मुंबई - रिक्षा आणि टॅक्सीवाले यांच्या मुजोरीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हा टॅक्सी आणि रिक्षामध्ये लावणे अनिवार्य करण्यात येणार असून या टोल फ्री नंबरची जास्तीत जास्त जाहिरात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. मुंबईच्या रस्त्यावर दिवसेंदिवस रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी वाढत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त असून परिवहन विभागाने यावर लक्ष घालावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद ठाकूर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सादर केली होती. 

परिवहन विभागातर्फे रिक्षा-टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी 1800220110 हा टोल फ्री क्रमांक  वाहनात लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच 62426666 या हेल्पलाईन क्रमांकाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीवर चालणार्‍या रिक्षांना परवानगी याआधीच दिली होती. आता त्याच प्रमाणे ओला-उबेर कंपनीच्या गाड्यांनाही सिटी टॅक्सीच्या दर्जा देऊन सीएनजी वापरण्यासाठी सक्तीचे करणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. प्रदूषण कमी करण्यासंबंधीचे विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता. तसेच कालबाह्य झालेल्या रिक्षा-टॅक्सी कायमच्या बंद करण्यासंबंधी कार्यवाही सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले. 

एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत १४,७८८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४३२८ वाहन दोषी आढळले आहेत. त्यापैकी १२९४ चालक परवाने निलंबित केले असून १०२४ वाहनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच दोषी चालकांकडून ६८.७२ लाख तडजोड शुल्क व १५.६२ लाखांचा न्यायालयीन दंड वसूल केला असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. 

राज्याच्या ग्रामीण भागात पांढर्‍या नंबरवर चालणार्‍या ४ लाख बेकायदेशीर रिक्षा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर अचानक बंदी आणली तर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मार्च २०१८ पर्यंत काही शुल्क भरून त्यांना अधिकृत केले जाईल. मार्च नंतर मात्र शुल्क न भरणाऱ्या रिक्षांना बेकायदेशीर ठरवले जाईल, अशी माहितीही रावते यांनी दिली. 

रिक्षा-टॅक्सी चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्राफिक पोलीसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यास होमगार्डची मदत घेता येईल का? अशी सूचना हेमंत टकले यांनी केली. यावर गृहविभागाशी चर्चा करु व होमगार्ड बद्दल निर्णय घेऊ, असे रावते म्हणाले. या लक्षवेधी सूचनेदरम्यान राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, अॅड. जयदेव गायकवाड यांनी देखील प्रश्न विचारले होते.