शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या ‘क्वॉलिटी’लाच आयएसओची मुभा

By admin | Updated: March 11, 2016 01:47 IST

तालुक्यातील शाळांची तपासणी न करता बोगसपणे आयएसओ प्रमाणपत्र बहाल करणाऱ्या ‘क्वॉलिटी असेसर्स’ या कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पंचायत समितीने

शिरूर : तालुक्यातील शाळांची तपासणी न करता बोगसपणे आयएसओ प्रमाणपत्र बहाल करणाऱ्या ‘क्वॉलिटी असेसर्स’ या कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पंचायत समितीने या कंपनीला तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देण्याची मुभा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एक वर्षापूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र देऊन आयएसओसाठी १० हजार रुपये (अ‍ॅडव्हांस) जमा करण्यास सांगितले होते. यात ६५ ग्रामपंचायतींची, १४७ जि.प. शाळा व ७० ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात आली होती. प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निकष आहेत; मात्र क्वॉलिटी अ‍ॅसेसर्स या कंपनीचा बोगसपणा तेव्हा समोर आला, जेव्हा या कंपनीने ढोकसांगवी या शाळेला भेट न देता, पाहणी, तपासणी न करताच पुण्यात आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले. मुळात ही शाळा आयएसओच्या निकषातच बसत नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, या बातमीच्या आधारे आमदार नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ढोकसांगवी जि.प. शाळेस निकषानुसार प्राणपत्र दिल्याचे लेखी उत्तर दिले होते. या शाळेबरोबरच तालुक्यातील कर्डेलवाडी, शिरूर ग्रामीण, जांभळीमळा, जातेगाव बु., वाबळेवाडी, पिंपळे खालसा, कोयाळी पुनवर्सन, चाकण रोड, २३ वा मैल, भोंडवेवस्ती (करंदी), माशेरेमळा, शिवनगर, शिवनगरवाडी, गाजरेझाप, काठापूर खुर्द, खंडागळेवस्ती, बहरू फराटेवाडी, वडगावरासाई, निंबाळकरवस्ती, या शाळा (जि.प.) रामलिंग, तरडोबावाडी, दरेकरवाडी, वाबळेवाडी या अंगणवाड्या, तर कारेगाव, तरडोबावाडी व शिरूर ग्रामीण या ग्रामपंचायती यांना आयएसओ प्रमाणपत्र वाटप झाल्याचेही उमाप यांच्या उत्तरात नमूद होते. वास्तविक परिस्थिती ढोगसांगवीप्रमाणेच आहे. ज्या शाळांना आयएसओ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी बहुतांशी शाळा या निकषात बसत नसल्याचे वास्तव आहे. क्वॉलिटी अ‍ॅसेसर्सच्या या बोगसगिरीला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले आहे.पंचायत समितीने कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्याला पुन्हा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या तपासणीची परवानगी दिली आहे. कंपनीला तपासणी करून, निकष पडताळून प्रमाणपत्र देण्यापेक्षा थेट प्रमाणपत्र देण्यातच रस आहे. हे शाळांना बहाल करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवरून लक्षात येते. ६५ ग्रामपंचायतींनी या कंपनीकडे प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले आहेत. ढोकसांगवीचे प्रमाणपत्र रद्द केल्याचे सहायक बीडीओ बांगर यांनी सांगितले. यावरून हे प्रमाणपत्र बोगस होते हे सिद्ध झाले असतानाही त्याच कंपनीला पुन्हा प्रमाणपत्र वाटपाची परवानगी कशासाठी, हा प्रश्न आहे.शिरूर तालुक्यातील बोगस आयएसओ प्रमाणपत्राचा प्रकार पुढे आला असतानाही जिल्हा परिषदेने जिल्ह्यात व इतर तालुक्यांत पुन्हा हे प्रमाणपत्र वाटप सुरू केले आहे. यात मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे. तालुका प्रशासनाने ढोेकसांगवीचा मुद्दा मान्य केला; मात्र उमाप यांनी अधिवेशनात खोटी माहिती देऊन हा मुद्दा दडपण्याचा प्रकार केला. याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे पाचंगे म्हणाले.