शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 16:55 IST

माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.

जालना – विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ हे न्यायमंदिर आहे. आता त्यांना स्वत:च्या जातीविषयी गर्व झालाय, असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? सरकारनं न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेता प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो. तुमचे विचार कसे पाहिजे, राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर सगळ्यांना दाखवतो, माझ्या गोरगरिब लेकरांना आरक्षण द्या, ही धमकी समजता का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणतात, राहुल गांधींनी मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी तुम्हाला पाठवले का? विरोधी पक्षनेता कुणाचा नसतो, तो जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? आम्ही बोललो, धमकी कुठे दिली. सरकारला वाईट बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही हिरो झालो नाही, स्वत:ला हिरो मानत नाही. मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून आम्हाला मोडायला निघाले होते, आंदोलन संपवायचे होते. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु उभा हयातीत मराठ्यांमध्ये तुम्हाला संभ्रम निर्माण करता येणार नाही. तुमची पिढीसुद्धा मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही. राजकारणासाठी कोण काय करतंय हे मराठ्यांना चांगले माहिती झाले आहे. तुमच्याबद्दल तर खूप झालंय, तुमचे सल्ले देण्याची गरज नाही. जालनात ओबीसीतून आरक्षण देण्याचं तुम्ही बोलला होता, परंतु तिथून निघाल्यावर सरड्यासारखा रंग बदलला हे मराठ्यांनी पाहिले, त्यामुळे आम्हाला तुम्ही सल्ले देऊ नका. असं प्रत्युत्तरही मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिले.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

जालनातील गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील हिरो झाले, त्यानंतर आता ज्या गोष्टी घडत आहेत. हम झुका सकते है अशा अर्विभावात समाजाचे पाठबळ मिळाल्यानं जरांगे पाटील यांना गर्व झाला, धमक्या द्यायला लागले. नाही केले तर बघून घेऊ, आम्हालाही धमक्या देतात असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला.

दरम्यान, मराठा समाजाला EWS मधून १० टक्के आरक्षणाचा फायदा होत असेल तर तो फार मोठा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उचलण्याचा हेतू असावा. ओबीसीत येऊन ३७२ जातींमध्ये समावेश करून त्यांना फार काही फायदा होणार नाही. खुल्या प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. यातून मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जाती