शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 16:55 IST

माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.

जालना – विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ हे न्यायमंदिर आहे. आता त्यांना स्वत:च्या जातीविषयी गर्व झालाय, असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? सरकारनं न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेता प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो. तुमचे विचार कसे पाहिजे, राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर सगळ्यांना दाखवतो, माझ्या गोरगरिब लेकरांना आरक्षण द्या, ही धमकी समजता का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणतात, राहुल गांधींनी मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी तुम्हाला पाठवले का? विरोधी पक्षनेता कुणाचा नसतो, तो जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? आम्ही बोललो, धमकी कुठे दिली. सरकारला वाईट बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही हिरो झालो नाही, स्वत:ला हिरो मानत नाही. मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाकडून आम्हाला मोडायला निघाले होते, आंदोलन संपवायचे होते. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु उभा हयातीत मराठ्यांमध्ये तुम्हाला संभ्रम निर्माण करता येणार नाही. तुमची पिढीसुद्धा मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही. राजकारणासाठी कोण काय करतंय हे मराठ्यांना चांगले माहिती झाले आहे. तुमच्याबद्दल तर खूप झालंय, तुमचे सल्ले देण्याची गरज नाही. जालनात ओबीसीतून आरक्षण देण्याचं तुम्ही बोलला होता, परंतु तिथून निघाल्यावर सरड्यासारखा रंग बदलला हे मराठ्यांनी पाहिले, त्यामुळे आम्हाला तुम्ही सल्ले देऊ नका. असं प्रत्युत्तरही मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिले.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

जालनातील गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटील हिरो झाले, त्यानंतर आता ज्या गोष्टी घडत आहेत. हम झुका सकते है अशा अर्विभावात समाजाचे पाठबळ मिळाल्यानं जरांगे पाटील यांना गर्व झाला, धमक्या द्यायला लागले. नाही केले तर बघून घेऊ, आम्हालाही धमक्या देतात असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला.

दरम्यान, मराठा समाजाला EWS मधून १० टक्के आरक्षणाचा फायदा होत असेल तर तो फार मोठा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उचलण्याचा हेतू असावा. ओबीसीत येऊन ३७२ जातींमध्ये समावेश करून त्यांना फार काही फायदा होणार नाही. खुल्या प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. यातून मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जाती