शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 16:28 IST

Rohit Pawar PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची घोषणा होऊन ८ वर्ष झाली, तरी कोणतेही काम झालेले नाही. हा मुद्दा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापू लागला आहे. 

Maharashtra Elections 2024: अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा विषय महाराष्ट्रात पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून महायुती सरकारला विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. संभाजीराजे भोसले यांनी अरबी समुद्रात स्मारकाचं ज्या ठिकाणी जलपूजन झाले, तिथे जाण्याची घोषणा केली. पण, त्यांना रोखण्यात आले. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी महायुती सरकारला घेरले आहे. 

"नर्मदा नदीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकास कोणत्याही अडचणी येत नाहीत पण अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकासच अडचणी का येतात?", सवाल आमदार रोहित पवारांनी यानिमित्ताने केला आहे. 

"राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र, पण उत्तर नाही"

रोहित पवार म्हणाले, "अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन होऊन 8 वर्षे झाली तरी देखील स्मारकाची एक वीट देखील रचली गेली नाही. यासंदर्भात जुलै 2022 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र दिले पण त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही."

"वर्षभराने जुलै 2023 मध्ये तत्कालीन राज्यपाल महामहीम बैस साहेबांची भेट घेऊन त्यांना याविषयी लक्ष घालण्याची विनंती केली असता, त्यांनी मात्र मुख्य सचिवांना त्वरित लक्ष घालण्याचे आदेश दिले. परंतु तरीदेखील सरकारने आपली निष्क्रियता सोडलीच नाही. यावरून सरकार किती गंभीर आहे ते स्पष्ट होते", अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

कोणाचा दबाव तर नाही ना? रोहित पवारांचा सरकारला सवाल

रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे की, "असो, राज्य सरकारने समन्वय साधला असता, तर स्मारक नक्कीच झाले असते ना? नर्मदा नदीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास कोणत्याही अडचणी येत नाहीत; पण अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकासच अडचणी का येतात? हे स्मारक होऊ नये यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना? असे कितीतरी प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडल्याशिवाय राहत नाही. यावर सरकार उत्तर देईल, ही अपेक्षा."

विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी अडचणीचा मुद्दा

संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. यावरून आता विरोधकही महायुतीला बोलताना दिसत आहे. विधानसभा निवडणूक काही आठवड्यांवर आलेली असताना हा मुद्दा पुढे आल्याने महायुती सरकारला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबईRohit Pawarरोहित पवार