शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? तपासावे लागेल", शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:54 IST

Sanjay Gaikwad : रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्यानेही संजय गायकवाड आक्रमक झाले.

बुलढाणा : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन आता विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? हे तपासावे लागेल, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याची व चिखलफेक करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असताना दुसरीकडे हे वाचाळवीर पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झाला वाटतं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्यानेही संजय गायकवाड आक्रमक झाले. बापाच्या नावाचाही एकेरी शब्दात उल्लेख करता का? असा सवाल रावसाहेब दानवे यांना आमदार गायकवाड यांनी केला आहे. याशिवाय, संजय गायकवाड यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून सुरु असलेल्या मुद्द्यांवरून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बसलेले नाहीत, तर काम करण्यासाठी बसलेले आहेत. तसेच, सीमाभागात घडलेल्या काही घडामोडींबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करून दाखवतील, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

याचबरोबर, आज मुंबई येथे उद्धव ठाकरे आणि वंचितमध्ये युतीची बैठक होत आहे, या संदर्भात संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित अशा चार पक्षांची युती आपल्याला पकडावी लागेल. तसेच, वंचितचे नेते यांनी जाहीरपणे सांगतात की ,आम्ही राष्ट्रवादी किंवा शरद पवारांसोबत आणि मराठ्यांच्या पक्षासोबत कधीही जाणार नाही. आता ती ही सगळी गणिते भविष्यात कशी बसवतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे, असे संजय गायकवाड म्हणाले. 

काय म्हणाले होते प्रसाद लाड?गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान त्यांनी केले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल... पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे त्यांनी म्हटले. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचे बालपण रायगडावर गेले, असे प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असोही लाड म्हणाले.

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडPrasad Ladप्रसाद लाड