शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराची ईडीकडून चौकशी करा : खा़ राजू शेट्टी

By admin | Updated: June 7, 2016 21:24 IST

राज्यातील सहकारी साखर कारखान्याची विक्री करीत अनेकांनी खाजगी कारखाने उभे केले. यामध्ये साखर कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार केला आहे मात्र यामध्ये राजकारण होत असल्याने कारवाई होत नाही

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. ७ : राज्यातील सहकारी साखर कारखान्याची विक्री करीत अनेकांनी खाजगी कारखाने उभे केले. यामध्ये साखर कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार केला आहे मात्र यामध्ये राजकारण होत असल्याने कारवाई होत नाही. यासाठी मी ईडीच्या संचालकांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ही कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे खा. राजू शेट्टी म्हणाले. नूतन आ. सदाभाऊ खोत यांच्या सत्कारानिमित्त मंगळवारी पंढरपूरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, दीपक भोसले, विष्णू बागल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील ३५ खाजगी कारखान्याची मालमत्ता ही दहा हजार कोटींची आहे. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री ती १० कोटीची दाखविली आहे. यामध्ये खूप मोठा भ्रष्ठाचार झाला असून याची चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र राजकीय अडचणीमुळे कारवाई होत नसल्यामुळे मी ईडीच्या संचालकांना भेटून कारवाईची मागणी केली आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर ईडीला चौकशीचे अधिकार असल्यामुळे मी जनहित याचिका दाखल करणार आहे. नुकतीच ऊस दर नियंत्रक समितीचे साखर आयुक्तांसोबत बैठक झाली असून एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे राज्यातील काही कारखान्यांना दंड केला असून काहींचे गाळप परवाने रद्द केले आहेत. मागील सरकारपैक्षा हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासांठी काम करीत असून काही निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. मागील तीस वर्षे चळवळीत प्रामाणिकपणे काम केलेल्या सदाभाऊंना उशीरा का होईना पण न्याय मिळाला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर भाजपासोबत युती केली असून यावेळी माढ्याची जागा देण्याची मागणी केली होती. ती स्व. मुंडे यांनी मान्य केली. सोलापुर जिल्ह्यात चळवळ संपवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले मात्र चळवळ संपली नाही. उलट संघटना वाढतच गेल्यामुळे प्रस्थापितांदा धक्का बसला असल्याचेही खा.शेट्टी यावेळी म्हणाले. कर्जमुक्ती देशव्यापी अभियान सुरू राज्यातील शेतकऱ्यांना कर्जामुळे आत्महत्या कराव्या लागत आहेत. मात्र शासनाची मदत वेळेवर मिळत नाही. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्यासाठी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. याची सुरूवात तुळजापूर येथे नुकतीच केली आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे यासाठी एका सेमिनारचे आयोजन केले आहे. लवकरच प्रत्येक गावातील शेतकऱ्यांकडून कर्जासंदर्भात फॉर्म भरून घेण्यात येणार असल्याचेही खा. शेट्टी म्हणाले.