शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पुनर्मूल्यांकनास शाळांकडून अडथळा

By admin | Updated: June 10, 2016 01:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव शाळांच्या मार्फत विभागीय मंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संबंधित शाळेच्या वर्गशिक्षकांना छायांकित प्रत दाखविणे आवश्यक आहे. मात्र, शाळांकडून विद्यार्थी व पालकांना सहकार्य केले जात नसल्याचे समोर आले आहेत.राज्यमंडळाने दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती देण्यास तसेच पुनर्मूल्यांकन्याचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरूवात केले आहे. राज्य मंडळाने त्यासाठी वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे ठराविक कालावधीमध्येच छायांकित प्रत घेवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतून यासंदर्भातील प्रस्ताव पाठविणे बंधनकारक आहे. परंतु, काही शाळांकडून पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच उभे केले जाते. उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एका पालकाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव शाळेमार्फत मंडळाकडे पाठवावे लागतात. परंतु, काही शाळांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा चुकीची वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. एका पालकाने दस्तूर शाळेबाबत लेखी तक्रार दिली आहे. मंडळाकडे पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव योग्य वेळेत गेले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. कोणत्याही शाळेबाबत विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.