शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 08:35 IST

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे

मुंबई- ३ दिवसीय ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समिटची मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. महाराष्ट्रातील समुद्री व्यापार पाहता समिटच्या पहिल्याच दिवशी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने मुंबईनजीक पालघरच्या वाढवणमध्ये ६१ हजार कोटींचं बंदर उभारण्यासाठी MOU केला आहे. वाढवण बंदर तयार करण्यासाठी ३ कंपन्यांसोबत हा करार केला आहे. त्यात १-१ किलोमीटरचे एकूण ९ टर्मिनल असतील. वाढवण बंदरामुळे राज्याचा आर्थिक फायदा तर होणारच परंतु त्याचसोबत हजारोंनी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे. जेएनपीटीनंतर राज्यात आणखी एक बंदर निर्मितीनंतर समुद्रीमार्गे व्यापाराला दुप्पट चालना मिळेल अशी आशा आहे. या समिटचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात सागरी व्यापाराचा मोठं योगदान असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

समुद्र किनारे, बंदरे, नवीन जलमार्ग आणि देशातच जहाज निर्माण होत आहेत. समुद्री पर्यटक आणि देशात येणाऱ्या क्रूझची संख्या सातत्याने वाढत आहे. लवकरच भारत जगातील क्रूझ हब होणार आहे. मुंबईत बनणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचा त्यात मोठा वाटा असेल. मंगळवारी पंतप्रधानांनी २३ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांचे उद्धाटन केले. ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी करण्यात आली असून सुमारे ४५०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली. हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाईल. मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे ७.१६ लाख कोटी रुपयांचे ३०० हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य मते, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल २०२४ पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे २०० क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२२-२३ मध्ये जेएनपीटी हे जगातील टॉप ३० बंदरांपैकी एक राहिले आहे. त्याचवेळी मुंबई बंदराच्या क्रूझ टर्मिनलवरून शेकडो विदेशी पर्यटक येथे दाखल झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी