शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

२०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 08:35 IST

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे

मुंबई- ३ दिवसीय ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समिटची मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. महाराष्ट्रातील समुद्री व्यापार पाहता समिटच्या पहिल्याच दिवशी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने मुंबईनजीक पालघरच्या वाढवणमध्ये ६१ हजार कोटींचं बंदर उभारण्यासाठी MOU केला आहे. वाढवण बंदर तयार करण्यासाठी ३ कंपन्यांसोबत हा करार केला आहे. त्यात १-१ किलोमीटरचे एकूण ९ टर्मिनल असतील. वाढवण बंदरामुळे राज्याचा आर्थिक फायदा तर होणारच परंतु त्याचसोबत हजारोंनी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे. जेएनपीटीनंतर राज्यात आणखी एक बंदर निर्मितीनंतर समुद्रीमार्गे व्यापाराला दुप्पट चालना मिळेल अशी आशा आहे. या समिटचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात सागरी व्यापाराचा मोठं योगदान असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

समुद्र किनारे, बंदरे, नवीन जलमार्ग आणि देशातच जहाज निर्माण होत आहेत. समुद्री पर्यटक आणि देशात येणाऱ्या क्रूझची संख्या सातत्याने वाढत आहे. लवकरच भारत जगातील क्रूझ हब होणार आहे. मुंबईत बनणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचा त्यात मोठा वाटा असेल. मंगळवारी पंतप्रधानांनी २३ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांचे उद्धाटन केले. ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी करण्यात आली असून सुमारे ४५०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली. हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाईल. मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे ७.१६ लाख कोटी रुपयांचे ३०० हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य मते, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल २०२४ पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे २०० क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२२-२३ मध्ये जेएनपीटी हे जगातील टॉप ३० बंदरांपैकी एक राहिले आहे. त्याचवेळी मुंबई बंदराच्या क्रूझ टर्मिनलवरून शेकडो विदेशी पर्यटक येथे दाखल झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी