शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०२४ पर्यंत मुंबईत बनणार इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल; ६१ हजार कोटींचं नवीन बंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 08:35 IST

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे

मुंबई- ३ दिवसीय ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समिटची मंगळवारी मुंबईत सुरुवात झाली. महाराष्ट्रातील समुद्री व्यापार पाहता समिटच्या पहिल्याच दिवशी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने मुंबईनजीक पालघरच्या वाढवणमध्ये ६१ हजार कोटींचं बंदर उभारण्यासाठी MOU केला आहे. वाढवण बंदर तयार करण्यासाठी ३ कंपन्यांसोबत हा करार केला आहे. त्यात १-१ किलोमीटरचे एकूण ९ टर्मिनल असतील. वाढवण बंदरामुळे राज्याचा आर्थिक फायदा तर होणारच परंतु त्याचसोबत हजारोंनी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

सध्या राज्यात २ बंदरे आहेत, त्यात मुंबई आणि नवी मुंबईचे जेएनपीटी बंदर. शहराच्या अगदी जवळ असल्याने मुंबई बंदराहून होणारा व्यापार खूप कमी आहे. जेएनपीटीनंतर राज्यात आणखी एक बंदर निर्मितीनंतर समुद्रीमार्गे व्यापाराला दुप्पट चालना मिळेल अशी आशा आहे. या समिटचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यात सागरी व्यापाराचा मोठं योगदान असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

समुद्र किनारे, बंदरे, नवीन जलमार्ग आणि देशातच जहाज निर्माण होत आहेत. समुद्री पर्यटक आणि देशात येणाऱ्या क्रूझची संख्या सातत्याने वाढत आहे. लवकरच भारत जगातील क्रूझ हब होणार आहे. मुंबईत बनणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचा त्यात मोठा वाटा असेल. मंगळवारी पंतप्रधानांनी २३ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांचे उद्धाटन केले. ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी करण्यात आली असून सुमारे ४५०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली. हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाईल. मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे ७.१६ लाख कोटी रुपयांचे ३०० हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य मते, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल २०२४ पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे २०० क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२२-२३ मध्ये जेएनपीटी हे जगातील टॉप ३० बंदरांपैकी एक राहिले आहे. त्याचवेळी मुंबई बंदराच्या क्रूझ टर्मिनलवरून शेकडो विदेशी पर्यटक येथे दाखल झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी