शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

आठ न्यायाधीशांना अंतरिम मुदतवाढ

By admin | Updated: May 13, 2015 01:47 IST

न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी देशात सध्या कोणतीही संवैधानिक व्यवस्था अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेल्या विचित्र कोंडीतून मार्ग काढण्यासाठी

अजित गोगटे, मुंबई न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी देशात सध्या कोणतीही संवैधानिक व्यवस्था अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेल्या विचित्र कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या न भूतो अशा अंतरिम आदेशामुळे सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या आठ अतिरिक्त न्यायाधीशांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. न्यायालयीन आदेशाने अशा प्रकारे न्यायाधीश नेमले जाण्याची अथवा त्यांना मुदतवाढ दिली जाण्याची भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.या अंतरिम आदेशाने उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशांना मुदतवाढ मिळाली आहे त्यांत न्या. सुरेश चंद्रकांत गुप्ते, न्या. झका अझीझुल हक, न्या. कलापती राजेंद्रन श्रीराम, न्या. गौतम शिरीष पटेल, न्या. अतुल शरश्चंद्र चादूरकर, न्या. श्रीमती रेवती मोहिते-डेरे, न्या. महेश शरश्चंद्र सोनक आणि न्या. रवींद्र विठ्ठलराव घुगे यांचा समावेश आहे. या आठही जणांची २१ जून २०१३ रोजी दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती व ही मुदत येत्या २१ जून रोजी संपत होती. आता ते किमान ११ आॅगस्टपर्यंत पदावर राहू शकतील. सर्वसाधारणपणे उच्च न्यायालयावर न्यायाधीशांची प्रथमत: दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेनणूक केली जाते व त्यानंतर त्यांना कायम केले जाते. पूर्वी अशा अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’च्या शिफारशीवरून होत असे. परंतु आता सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार हे काम राष्ट्रीय न्यायिक निवड आयोगाने करणे अपेक्षित होते. परंतु सध्या अशी अवस्था आहे की सरकारने नवा कायदा केल्याने ‘कॉलेजियम’ मोडीत निघाले आहे. परंतु त्याची जागा घेणारा न्यायिक नियुक्ती आयोगही स्थापन झालेला नाही. या आयोगाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. पण या याचिकांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या आयोगाच्या कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका सरन्यायाधीशांनी घेतली. न्यायिक आयोगाविरुद्धच्या याचिकांवर न्या. जगदीश सिंह केहार यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. पूर्वी नऊ न्यायाधीशांच्या पूर्णपीठांनी दिलेल्या दोन निकालांनी २० वर्षांपूर्वी ‘कॉलेजियम’ पद्धत अस्तित्वात आली होती. त्यामुळे आताच्या याचिकांवरील सुनावणी किमान नऊ किंवा त्याहून जास्त संख्येच्या पीठापुढे घ्यावी, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु न्या. केहार यांच्या घटनापीठाने त्यास नकार देऊन आपल्यासमोरील सुनावणी सुरूच ठेवण्याचे ठरविले. मात्र ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जाईपर्यंतच्या काळात उच्च न्यायालयांवरील ज्या अतिरिक्त न्यायाधीशांची मुदत संपेल त्यांचे काय करायचे, अशी कोंडी निर्माण झाली. त्यामुळे असे अतिरिक्त न्यायाधीश आणखी तीन महिने पदांवर राहतील, असा आदेश घटनापीठाने दिला.