शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

आठ न्यायाधीशांना अंतरिम मुदतवाढ

By admin | Updated: May 13, 2015 01:47 IST

न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी देशात सध्या कोणतीही संवैधानिक व्यवस्था अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेल्या विचित्र कोंडीतून मार्ग काढण्यासाठी

अजित गोगटे, मुंबई न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी देशात सध्या कोणतीही संवैधानिक व्यवस्था अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेल्या विचित्र कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या न भूतो अशा अंतरिम आदेशामुळे सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या आठ अतिरिक्त न्यायाधीशांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. न्यायालयीन आदेशाने अशा प्रकारे न्यायाधीश नेमले जाण्याची अथवा त्यांना मुदतवाढ दिली जाण्याची भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.या अंतरिम आदेशाने उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशांना मुदतवाढ मिळाली आहे त्यांत न्या. सुरेश चंद्रकांत गुप्ते, न्या. झका अझीझुल हक, न्या. कलापती राजेंद्रन श्रीराम, न्या. गौतम शिरीष पटेल, न्या. अतुल शरश्चंद्र चादूरकर, न्या. श्रीमती रेवती मोहिते-डेरे, न्या. महेश शरश्चंद्र सोनक आणि न्या. रवींद्र विठ्ठलराव घुगे यांचा समावेश आहे. या आठही जणांची २१ जून २०१३ रोजी दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती व ही मुदत येत्या २१ जून रोजी संपत होती. आता ते किमान ११ आॅगस्टपर्यंत पदावर राहू शकतील. सर्वसाधारणपणे उच्च न्यायालयावर न्यायाधीशांची प्रथमत: दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेनणूक केली जाते व त्यानंतर त्यांना कायम केले जाते. पूर्वी अशा अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’च्या शिफारशीवरून होत असे. परंतु आता सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार हे काम राष्ट्रीय न्यायिक निवड आयोगाने करणे अपेक्षित होते. परंतु सध्या अशी अवस्था आहे की सरकारने नवा कायदा केल्याने ‘कॉलेजियम’ मोडीत निघाले आहे. परंतु त्याची जागा घेणारा न्यायिक नियुक्ती आयोगही स्थापन झालेला नाही. या आयोगाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. पण या याचिकांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या आयोगाच्या कामकाजात सहभागी न होण्याची भूमिका सरन्यायाधीशांनी घेतली. न्यायिक आयोगाविरुद्धच्या याचिकांवर न्या. जगदीश सिंह केहार यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. पूर्वी नऊ न्यायाधीशांच्या पूर्णपीठांनी दिलेल्या दोन निकालांनी २० वर्षांपूर्वी ‘कॉलेजियम’ पद्धत अस्तित्वात आली होती. त्यामुळे आताच्या याचिकांवरील सुनावणी किमान नऊ किंवा त्याहून जास्त संख्येच्या पीठापुढे घ्यावी, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु न्या. केहार यांच्या घटनापीठाने त्यास नकार देऊन आपल्यासमोरील सुनावणी सुरूच ठेवण्याचे ठरविले. मात्र ही सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जाईपर्यंतच्या काळात उच्च न्यायालयांवरील ज्या अतिरिक्त न्यायाधीशांची मुदत संपेल त्यांचे काय करायचे, अशी कोंडी निर्माण झाली. त्यामुळे असे अतिरिक्त न्यायाधीश आणखी तीन महिने पदांवर राहतील, असा आदेश घटनापीठाने दिला.