शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

फडणवीस सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांना न घेण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:51 IST

भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता.

- अतुल कुलकर्णी मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांकडे असणारे अधिकारी, खाजगी सचिव, ओएसडी यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता. तोच आता त्यांच्याच कार्यकाळातील अधिकाºयांना अडचणीत आणणारा ठरला आहे.जे अधिकारी दहा वर्षे मंत्री आस्थापनेवर कार्यरत होते त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवावे असा आदेश तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेवर येताच काढला होता. त्यामुळे २०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात जे अधिकारी मंत्री आस्थापनेवरहोते त्यांना मंत्र्यांकडे काम करता आले नाही. पुढे १० वर्षाचा कालावधी रद्द करुन तो पाच वर्षे केला गेला. तसा शासन आदेशही काढलागेला. तो अजुनही अस्तित्वात आहे. त्यामुळे त्या आदेशानुसारही जे अधिकारी पाच वर्षे मंत्री आस्थापनेवर होते त्यांना या सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्यांकडे काम करता येणार नाही. तसे करु द्यायचे असेल तो आदेश रद्द करावा लागणार आहे.सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भूसे या पूर्वाश्रमीच्या मंत्र्यांना महाविकास आघाडीतही मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे तो आदेश त्यांनाही लागू होतो. मात्र भाजपच्या मंत्र्यांनी जुन्या सरकारमधील काही अधिकाऱ्यांना ‘लोन बेसीसवर’ आपल्याकडे घेतले होते तसे या मंत्र्यांना आदेश कायम ठेवायचा असेल तर करावे लागेल. हे सरकार स्थिर होऊ नये यासाठी आघाडीतील नाराज आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. त्यांना फूस लावण्याचेही प्रयत्न होत आहेत, अशावेळी मावळत्या सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणारे अधिकारी जर विद्यमान मंत्र्यांनी घेतले तर या सरकारमधील सगळी माहिती आयतीच भाजप नेत्यांना मिळेल, त्यामुळे स्थीर होऊ पहात असलेल्या सरकारपुढे अडचणी वाढतील. हे होऊ द्यायचे नसेल त्या अधिकाऱ्यांना दूर ठेवा अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जर हे अधिकारी ठेवायचे असतील तर फडणवीस यांनी काढलेला शासन आदेश रद्द करावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा