शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मुलांना धन-दौलतीऐवजी संस्कारांचा वारसा द्या!

By admin | Updated: May 23, 2016 04:34 IST

मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल

नाशिक : मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल; पण त्यांना संस्कारांचा वारसा मात्र आवर्जून द्या. कारण तीच जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, असे आवाहन खासदार तथा ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यानमालेचे बाविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपल्या शांत पण ओघवत्या शैलीतील वक्तृत्वातून दर्डा यांनी उपस्थितांना स्वत्त्वाची जाणीव करून दिली. गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर मूळचंदभाई गोठी यांच्या स्मरणार्थ झालेल्या या व्याख्यानात त्यांनी ‘मैं कौन हूॅँ, मैं क्या हूॅँ’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयुष्यातील अनुभवांपासून भाषणाला प्रारंभ केल्यानंतर दर्डा यांनी या विषयाला व्यापक स्तरावर नेऊन ठेवले. ते म्हणाले, आपण कोण आहोत आणि या जगात का आलो आहोत, याचा तुम्ही कधी विचार केला? मी या जगात आलो की आणला गेलो? जर आणला गेलो असेल तर त्यामागे काही निश्चित उद्देश असेल. हा उद्देश शोधण्याची गरज आहे. तुम्ही डोळे बंद करून स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहा आणि स्वत:ला प्रश्न विचारा. तुम्हाला अनेकविध भावना, माणसे, घटना जाणवतील; पण स्वत:साठी किती जगलात, की आयुष्यभर दुसऱ्यासाठीच वेळ दिला, याचीही जाणीव होईल. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांनी आम्हा भावंडांचे अत्यंत वेगळ्या रीतीने पालनपोषण केले. त्यांनी आम्हाला ठरवून महापालिकेच्या शाळेत घातले. तिथल्या शिक्षकांच्या कपड्यांवर ठिगळे लावलेली असायची; पण त्यांच्यातल्या आत्मविश्वासाने आम्हाला संस्कार दिले. आज आपल्याकडे सारे काही आहे, फक्त संस्कार नाहीत. ते असते तर वृद्धाश्रम नसते. आम्ही जैन साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांची प्रवचनमाला घेतली, तेव्हा त्यासाठी आई, भाऊ, बहीण, पती-पत्नीतील नाते असे साधे-सोपे विषय ठेवले. दहा हजार लोक बसतील एवढा मंडप उभारला, तेव्हा प्रीतिसुधाजींनी ‘एवढी माणसे येतील का’ असे विचारले. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की, ‘जरुर येतील.’ अन् खरोखरच त्यांचे विचार लोकांना एवढे भावले की, अनेकांनी आपण आपल्या भाऊ, बहीण, सासूशी वाईट वागल्याची स्वत:हून कबुली दिली. एवढेच नव्हे, भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हेसुद्धा खास प्रवचन ऐकण्यासाठी आले. संवेदना, संस्कारांत ही शक्ती असते. आपण मंदिरांत जातो आणि देवाकडे काही ना काही मागत बसतो. लोक दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करून टाकतात; पण माता-पित्याच्या रूपाने आपल्या घरात देव बसले आहेत, हे आपण विसरून जातो. आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवून स्वत:च्या मुलाकडून आपल्याला सांभाळण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘मैं बनूंगा तुम कभी,तुम मैं कहलाओगे...जब जब भी मॉँ की याद आएगीतब तब मैं प्रेम की भावना बन जाऊंगा...’ या कवितेने दर्डा यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. या वेळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पुष्पादीदी, अविनाश गोठी यांच्यासह व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय हाके, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मधुकर झेंडे, अरुण शेंदुर्णीकर उपस्थित होते.