शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

गुजरातची ताकद डोकलामला लावली असती तर चिनी सैन्याने माघार घेतली असती - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 08:02 IST

गुजरातमध्ये राज्यसभेसाठीच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर सडेतोट टीका करत टोले लगावले आहेत

ठळक मुद्देहे राजकारण किळस आणणारे आहे, पण ‘हमाम में सब नंगे’ अशीच सध्या स्थिती असल्याने दोष तरी कोणाला द्यायचा? हिंदुस्थानातील डोक्यांची डबकी झाल्याची खबर चीनला असल्यानेच कश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याच्या धमक्या चीन देत असावागुजरातच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद डोकलामला लावली असती तर चिनी सैन्याने एव्हाना माघार घेतली असती

मुंबई, दि. 10 - गुजरातमध्ये राज्यसभेसाठीच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर सडेतोट टीका करत टोले लगावले आहेत. देश संकटात असताना सत्ताधारी व विरोधक गुजरातच्या एका राज्यसभा जागेसाठी एकमेकांवर तलवारी चालवतात. हे राजकारण किळस आणणारे आहे, पण ‘हमाम में सब नंगे’ अशीच सध्या स्थिती असल्याने दोष तरी कोणाला द्यायचा? असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत पटेल यांना पाडण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग आणि काळ्या पैशांचा अमाप वापर झाला या आरोपांत तथ्य असेल तर मग देशात स्वच्छ काय झाले? डबकी तशीच आहेत व सगळ्यांचाच विहार याच डबक्यांत सुरू आहे. हिंदुस्थानातील डोक्यांची डबकी झाल्याची खबर चीनला असल्यानेच कश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याच्या धमक्या चीन देत असावा. गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद डोकलामला लावली असती तर चिनी सैन्याने एव्हाना माघार घेतली असती अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

चीनने कश्मीर आणि उत्तराखंडात घुसण्याची धमकी दिली आहे. डोकलामच्या मुद्यावरून चीन आणि हिंदुस्थानात आधीच महिनाभरापासून तणाव आहे. त्यावरून चीन हिंदुस्थानला धडा शिकविण्याच्या गोष्टी करीत आहे. त्यात या नव्या धमकीची भर पडली आहे. अशावेळी चीनशी मुकाबला करण्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनीच छातीचा कोट करून लढण्याची तयारी करायला हवी, पण गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार यावरच सत्ताधारी व विरोधी पक्षाने बराच वेळ, पैसा, सत्ता व दबंगगिरी खर्च केली अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 

काँग्रेस पक्षाचे एक नेते अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कंबर कसली होती व पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसने देव किंवा अल्ला पाण्यात घातले होते. पटेल पडले नाहीत तर चीन, कश्मीरचा प्रश्न सुटणार नाही व पटेल जिंकले नाहीत तर ढासळलेल्या काँग्रेसचा जीर्णोद्धार होणार नाही असेच जणू या लोकांना वाटत होते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

पक्षांतर बंदीच्या शृंखला तोडून मतदान करणाऱयांनी निर्लज्जतेचे सर्व बांध तोडले. एखाद् दुसऱया भाजप समर्थकांनी अहमद पटेल यांना मतदान केले (असे म्हणतात) व दोन काँग्रेस आमदारांनी मतपत्रिकेवर भाजपलाच मतदान केल्याचे दाखवून पटेल यांचा विजय पक्का केला. पक्षादेश झुगारल्यामुळे त्या दोघांची मते बाद ठरवून घेण्यात काँग्रेसचे कायदेपंडित यशस्वी झाले. दोन्ही बाजूंचे संसदीय कायदेपंडित रात्रीपर्यंत निवडणूक आयोगात जाऊन लढे देतात व जय-विजयासाठी कायद्याचा कीस काढतात हे सर्वसामान्यांसाठी व राष्ट्रासाठी कधी घडेल काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढू लागली आहे हे या अभियानाचेच एक यश मानावे लागेल. रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकून अस्वच्छता करणे वगैरे गोष्टींसाठी या अभियानांतर्गत दंड आकारला जातो. ही चांगलीच गोष्ट आहे. पण सध्या ज्या पद्धतीने राजकारणात कचरा टाकला जात आहे तोदेखील दूर करायला हवा. हा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, या मताचे आम्ही आहोत. शेवटी राजकारणाचा गढूळ झालेला प्रवाहदेखील स्वच्छ झाला तरच खऱया अर्थाने ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी झाले असे म्हणता येईल अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे..

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे