शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी ‘दीपस्तंभ’

By admin | Updated: June 18, 2017 00:06 IST

दीपस्तंभ संस्था संचलित प्रकल्पांनी समाजातील वंचित, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना समाजातील मुख्य प्रवाहात आणले आहे.

दीपस्तंभ संस्था संचलित प्रकल्पांनी समाजातील वंचित, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना समाजातील मुख्य प्रवाहात आणले आहे.पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेतून स्पर्धा परीक्षा, ग्रामीण विकास, मनोबल विकास अशा ज्ञानाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेले यजुर्वेद महाजन यांनी २००५मध्ये ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ची स्थापना केली; आणि आज या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. पाहता पाहता ‘दीपस्तंभ’ने अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाच सनदी अधिकारी म्हणून तयार केले नाही, तर शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनाही वाट दाखवत त्यांच्या आयुष्याचा गाडा रुळावर आणला आहे.गेल्या ११ वर्षांत संस्थेत शिकलेल्या शेकडो मुलांनी अधिकारी दर्जाच्या सरकारी नोकरीत पदार्पण केलेले आहे. यामध्ये धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील सामोडे गावचा भिल्ल वस्तीत जन्माला आलेला आणि समाजातील पहिला सनदी अधिकारी असलेला डॉ. राजेंद्र भारुड. अंमळनेर तालुक्यातील डांगरी नावाच्या खेड्यात जन्मलेला पोलीस अधिकारी झालेला संदीप मखमल पाटील. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील उमर्टी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या निर्मला प्रेमसिंग पावराचे वडील अंध असून आई शेतमजुरी करते. दीपस्तंभामुळे तिच्या शिकण्याच्या ऊर्मीला आधार मिळाला आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती विक्रीकर अधिकारी झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील.पण ही झाली, शारीरिकदृष्ट्या धडधाकट मुलांची कामे. ते सुरू असताना काही तरी अपूर्ण असल्याची खंत यजुर्वेद यांना सतावत होती. कशाचा तरी शोध सुरू होता, हेही जाणवायचं. परंतु दोन वर्षांपूर्वी हा शोध संपला; आणि देशातील पहिल्या, अंध-अपंगांसाठीच्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राचा जन्म झाला. हात, पाय, डोळे नसले तरी प्रचंड मनोबलाच्या बळावर आकाश कवेत घेता येते, ही जिद्द जागविण्याचा प्रकल्प म्हणून याचे नाव ‘मनोबल’! महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा घेऊन प्रज्ञाचक्षू असलेल्या व विशेष मुला-मुलींची या केंद्रातील प्रवेशासाठी निवड करण्यात आली.कर्नाटकातील कोनगोली येथून मनोबल केंद्रात आलेला अपंग नरसगोंडा रावसाहेब चौगुले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी नावाच्या लहानशा गावातून आलेल्या, जन्मत:च अंध असलेल्या सुनीता दिनकर सनदी आणि रुचिरा दिनकर सनदी या बहिणींच्या बोलण्यातून हा आत्मविश्वास जाणवतो. अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्ये प्रशिक्षण केंद्र म्हणजे ‘मनोबल’ होय. कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजना गरीब, दुष्काळग्रस्त, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा निवासी प्रशिक्षण केंद्र म्हणजे ‘गुरुकुल’ होय. ग्रामीण व आदिवासी भागात अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर व इतर अनेक संकटांवर मात करून काही विद्यार्थी उत्तम गुणांसह पदवीधर होतात. मात्र आत्मविश्वास, मार्गदर्शन व आर्थिक सहकार्याच्या अभावामुळे त्यांना उच्च स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना गुरुकुल प्रकल्पात नि:शुल्क निवासी प्रशिक्षण दिले जाते. ज्यांचे जगात कोणीही नाही, ज्यांना प्रेम, मैत्री या भावनांची कधी ओळखच झाली नाही, अशा युवक-युवतींना आयुष्यात सन्मानाने उभे करण्यासाठी दीपस्तंभ संस्थेने ‘संजीवन’ प्रकल्प सुरू केला आहे. स्वयंदीपच्या माध्यमातून शेकडो अपंग महिलांना नियमित रोजगारासोबतच आत्मविश्वास, आत्मसन्मान मिळावा हे उद्दिष्ट आहे.प्रांजल पाटील आणि अल्पना दुबे या दोन प्रज्ञाचक्षू मुली या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या मनोबल प्रकल्पातील प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याव्यतिरिक्त १४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची विविध प्रशासकीय पदांवर निवड झाली आहे.दीपस्तंभ संस्था संचलित मनोबल प्रकल्पाने सोलापूरच्या लक्ष्मी नावाच्या विद्यार्थिनीला ३ वर्षांसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. या विद्यार्थिनीला दोन्ही हात नसून तिने पायाने पेपर लिहून १२वीत ६८ टक्के गुण मिळविले आहेत. तिला आयएएस होण्याची इच्छा आहे. शिक्षणतज्ज्ञ हरीष बुटले यांनी दीड लाख रुपये लक्ष्मीच्या शिक्षणासाठी निधी दिला आहे.