शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आरोग्याचा चातुर्मास अभिनव संकल्पना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:59 IST

आरोग्याचा चातुर्मास ही अभिनव संकल्पना असून, या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा मोफत पोहोचवण्यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, असे उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंपरी : आरोग्याचा चातुर्मास ही अभिनव संकल्पना असून, या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा मोफत पोहोचवण्यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, असे उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बोपोडी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, आदित्य माळवे, कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी शासन प्राधान्य देत असून, शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून कर्करोग, हृदयरोग यांसारख्या दुर्धर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आरोग्याचा चातुर्मास ही नवीन संकल्पना असून, या संकल्पनेमध्ये केवळ आरोग्य तपासणीच होत नाही, तर आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून या उपक्रमासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल.आमदार विजय काळे यांनी आयोजनामागचा हेतू विशद केला. ते म्हणाले, की आजच्या शिबिरात आतापर्यंत ९०० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, सायंकाळपर्यंत दोन हजार महिलांची तपासणी होईल. शहरात अन्य ठिकाणीही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.’’ 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार