शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:18 IST

नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले.

नागपूर : नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी नाणारमध्ये कोस्टल रिफायनरीला होत असलेला विरोध पाहता ही रिफायनरी विदर्भात स्थापित करण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘त्यांना माहीत आहे नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरी ही कोस्टल (समुद्र तट) आहे, आणि समुद्राला विदर्भात आणता येऊ शकत नाही. परंतु रिफयनरी मात्र निश्चित स्थापित होऊ शकते. यामुळे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष व १ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देशाला ‘आॅईल सिक्युरिटी’ देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी नाणारमध्ये रिफायनरी येणार की नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी विदर्भात रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत नाणारबाबतचे उत्तर देण्याचेटाळले.>विजय दर्डा यांनी केली होती सूचनालोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुचविले होते की, नाणार येथील लोक रिफायनरीला विरोध करीत आहेत, तर तो प्रकल्प विदर्भात आणता येऊ शकतो. आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ दर्डा यांनी असे केल्यास होणारे फायदेही सांगितले होते. ते असे -१) रिफायनरीमुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.२) कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या समानांतर पाईपलाईन टाकून प्रतिवर्ष ४८ हजार कोटी रुपयाची बचत केली जाऊ शकते.३) विदर्भातील रिफायनरीला रायपूर, जबलपूर आणि नागपूरच्या विमानतळाशी पाईपलाईनने जोडून माफक दरात एटीएफचा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे विमान वाहतूक उद्योग आणि पर्यटनाला गती मिळेल. दर्डा यांनी असेही सुचविले होते की, जर नाणार रिफायनरीला काही कारणास्तव विदर्भात आणणे शक्य झाले नाही तर विदर्भ परिसरात एक नवीन ग्रीनफिल्ड रिफायनरी स्थापित केली जावी. भारतात कच्च्या तेलाचे शुद्धीकरण (रिफाईन)करण्याची सध्याची क्षमता २४० मिलियन टन इतकी आहे. ती २०३० पर्यंत ४४० मिलियन टनापर्यंत पोहोचवावी लागेल. त्यामुळे नवीन रिफायनरींची गरज पडणार आहे आणि त्यापैकी एक विदर्भात स्थापित केली जावी. दर्डा यांच्या पत्राच्या सुमारे १८ दिवसानंतर शिवसेनेने नाणार रिफायनरीला विरोध सुरू केला. २३ एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकरी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दर्डा यांच्या विचारांचे समर्थन करीत नाणार रिफायनरीला विदर्भात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.>देवेंद्र, धर्मेंद्र आणि नरेंद्रसभागृहात त्यावेळी सर्वांनाच हसू आले जेव्हा आशिष देशमुख यांनी ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत म्हटले की ‘ मी (देवेंद्र) रिफायनरी स्थापित करण्याची विनंती धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवेल.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८