शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांच्या माहितीत घोळ !

By admin | Updated: October 7, 2016 20:00 IST

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यासाठी पणन संचालकांनी राज्यातील बाजार समित्यांकडून मागविलेल्या माहितीमध्ये

- गणेश मापारी/ ऑनलाइन लोकमत 

खामगाव, (जि.बुलडाणा), दि.07 -  कांदा उत्पादक शेतक-यांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यासाठी पणन संचालकांनी राज्यातील बाजार समित्यांकडून मागविलेल्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे कांदा  उत्पादक शेतक-यांची माहिती त्रीसदस्य समितीकडून प्रमाणित करुन पाठविण्याचे आदेश पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांना २७ सप्टेंबर रोजी दिले आहेत.
कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री केलेल्या शेतकºयांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकºयास जास्तीत जास्त २०० क्विंटल मयार्देपर्यंत प्रतिक्विंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. सदर अनुदान मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतक-यांना सातबारा उतारा, बँंक बचत खाते क्रमांकासोबतच कांदा विक्रीपट्टी आदी तपशिलासह संबंधित बाजार समितीकडे अर्ज करण्यांचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पणन  संचालकांनी सर्व बाजार समित्यांकडून १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील कांदा विक्रीची माहिती घेतली. बाजार समित्यांकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेली माहिती आणि पणन संचालकांकडे जुलै-आॅगस्टमध्ये आलेली आॅनलाईन माहिती यामध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पुन्हा माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समित्यांनी कांदा विकलेल्या शेतक-यांची माहिती प्रमाणित करुन दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी सुध्दा हि माहिती प्रमाणित करुनच पणन संचालकांकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 
 
प्रमाणित माहितीसाठी त्रिसदस्यीय समिती 
कांदा उत्पादक शेतक-यांची योग्य माहिती शासनाकडे यावी, यासाठी पणन संचालकांनी त्रिसदस्यीय समितीकडून ही माहिती प्रमाणित करुन मागितली आहे. तालुका उपनिबंधक, बाजार समितीचे सचिव आणि तालुका लेखापरिक्षक या तिघांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेली माहितीच पाठविण्यात यावी, असे निर्देश पणन संचालकांनी दिले आहेत.
 
व्यापा-यांना कांदा विकणारे शेतकरी वा-यावर
शासनाने बाजार समितीमध्ये कांदा विकणा-या शेतक-यांनाच अनुदान देण्याची योजना आखली आहे. मात्र राज्यातील अनेक बाजार समित्या कांद्याची खरेदी करीत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव शेतक-यांना व्यापा-यांना कांदा विकावा लागतो. शासनाच्या या धोरणामुळे व्यापा-यांना कांदा विकणारे लाखो शेतकरी वा-यावर सोडल्या गेले आहेत. परिणामी सातबा-यावरील कांदा पेरणीच्या नोंदीनुसार हे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतक-यांकडून केल्या जात आहे.