शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कांदा उत्पादकांच्या माहितीत घोळ !

By admin | Updated: October 7, 2016 20:00 IST

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यासाठी पणन संचालकांनी राज्यातील बाजार समित्यांकडून मागविलेल्या माहितीमध्ये

- गणेश मापारी/ ऑनलाइन लोकमत 

खामगाव, (जि.बुलडाणा), दि.07 -  कांदा उत्पादक शेतक-यांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यासाठी पणन संचालकांनी राज्यातील बाजार समित्यांकडून मागविलेल्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे कांदा  उत्पादक शेतक-यांची माहिती त्रीसदस्य समितीकडून प्रमाणित करुन पाठविण्याचे आदेश पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांना २७ सप्टेंबर रोजी दिले आहेत.
कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री केलेल्या शेतकºयांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकºयास जास्तीत जास्त २०० क्विंटल मयार्देपर्यंत प्रतिक्विंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. सदर अनुदान मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतक-यांना सातबारा उतारा, बँंक बचत खाते क्रमांकासोबतच कांदा विक्रीपट्टी आदी तपशिलासह संबंधित बाजार समितीकडे अर्ज करण्यांचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पणन  संचालकांनी सर्व बाजार समित्यांकडून १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील कांदा विक्रीची माहिती घेतली. बाजार समित्यांकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेली माहिती आणि पणन संचालकांकडे जुलै-आॅगस्टमध्ये आलेली आॅनलाईन माहिती यामध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पुन्हा माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. बाजार समित्यांनी कांदा विकलेल्या शेतक-यांची माहिती प्रमाणित करुन दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी सुध्दा हि माहिती प्रमाणित करुनच पणन संचालकांकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 
 
प्रमाणित माहितीसाठी त्रिसदस्यीय समिती 
कांदा उत्पादक शेतक-यांची योग्य माहिती शासनाकडे यावी, यासाठी पणन संचालकांनी त्रिसदस्यीय समितीकडून ही माहिती प्रमाणित करुन मागितली आहे. तालुका उपनिबंधक, बाजार समितीचे सचिव आणि तालुका लेखापरिक्षक या तिघांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेली माहितीच पाठविण्यात यावी, असे निर्देश पणन संचालकांनी दिले आहेत.
 
व्यापा-यांना कांदा विकणारे शेतकरी वा-यावर
शासनाने बाजार समितीमध्ये कांदा विकणा-या शेतक-यांनाच अनुदान देण्याची योजना आखली आहे. मात्र राज्यातील अनेक बाजार समित्या कांद्याची खरेदी करीत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव शेतक-यांना व्यापा-यांना कांदा विकावा लागतो. शासनाच्या या धोरणामुळे व्यापा-यांना कांदा विकणारे लाखो शेतकरी वा-यावर सोडल्या गेले आहेत. परिणामी सातबा-यावरील कांदा पेरणीच्या नोंदीनुसार हे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतक-यांकडून केल्या जात आहे.