शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

महागाईचा तडका !

By admin | Updated: July 3, 2014 01:05 IST

महागाईची झळ सामान्यांना बसते आहे. आजचे दर उद्या नाहीत व उद्याचे परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. उपराजधानीत जीवनावश्यक

भाज्यांची स्वयंपाकघरातून एक्झिट : धान्यही आवाक्याबाहेर नागपूर : महागाईची झळ सामान्यांना बसते आहे. आजचे दर उद्या नाहीत व उद्याचे परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. उपराजधानीत जीवनावश्यक वस्तू आणि धान्य व कडधान्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. वाढत्या साठेबाजीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसते आहे. इकडे भाज्यांचेही दर वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. कांदा रडवणार मंगळवारी केंद्राने कांद्याचे निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन ५०० डॉलरपर्यंत वाढविल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये भाव अचानक वाढले. कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २० रुपयांवर गेले. किरकोळमध्ये कांदा दर्जानुसार २५ ते ३० रुपयांदरम्यान आहे. त्यात आणखी भाववाढ होऊ शकते, असे मत कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. निर्यात मूल्य वाढताच कळमन्यात आवक २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दिवाळीपर्यंत कांदा खाली येण्याची शक्यता नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड कमी झाली असून उत्पादन घटण्याची भीती आहे. लांबलेल्या पावसाने राज्यातील कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कांदा शेतकरी आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडे आहे. यंदा पाऊस लांबल्याने दक्षिणेतील कांदा पिकाचे भवितव्य काय राहील, हे आताच सांगता येणार नाही. जीवनावश्यक वस्तूही महागसरकारच्या आकडेवारीत लोकांना स्वारस्य नाही. त्यांना वस्तूंचे दर समजतात व शंभर रुपयात काल ज्या वस्तू येत होत्या त्या आज येत नाहीत. त्याला आज जास्त पैसे मोजावे लागतात एवढेच समजते. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावांचा आलेख चढता आहे व ही महागाई कुठपर्यंत जाईल, या कल्पनेनेच सामान्य माणूस आज धास्तावलेला आहे. धान्य, कडधान्य, खाद्य तेल, भाज्या, दूध, चहा, साखर, गूळ यांचे भाव सतत वाढत आहेत व ते आणखी किती वाढणार आहेत, हे सांगता येणार नाही. डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. चणा डाळ व तांदूळ महागलाआठवड्यात चना डाळ आणि तांदळाचे भाव अचानक वधारले. यंदा पाऊस लांबल्याने ही वेळ ओढविली आहे. डाळ २०० रुपये तर तांदळाचे दर प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वधारले आहेत. ठोक बाजारात चना डाळ ३२०० ते ३८०० रुपये क्विंटलवर गेली. सुवर्णा तांदूळ प्रति क्विंटल २४०० ते २६५०, डीपीटी २८५० ते ३२५०, एचएमटी ३८०० ते ४२५०, श्रीराम ४४०० ते ५१५०, चिन्नोर ५००० ते ५४००, बासमती ७५०० ते १३ हजार रुपये भाव आहेत. गव्हाला मागणी नसल्याने भाव स्थिर आहेत. लोकवन १८०० ते २२५०, तिकडी २१०० ते २३५०, मध्यम शरबती २५०० ते २८००, बेस्ट शरबती २८०० ते ३२०० रुपये भाव आहेत. इतवारी ठोक बाजारात तूर डाळ ५४०० ते ६६००, मूंग मोगर ८०० ते ९५००, मंूग डाळ ७५०० ते ८५००, उडद मोगर ७००० ते ८५००, उडद डाळ काळी ५५०० ते ६५००, मसूर डाळ ६००० ते ६६००, हिरवा मटर ४२०० ते ४८०० मूंग हिरवा ६५०० ते ८५००, मोट ५५०० ते ७२००, बरबटी ४४०० ते ५८०० रुपये क्विंटल असल्याचे कळमना धान्य बाजारातील व्यापारी रमेश उमाटे यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचा फटका धान्य बाजारपेठांवर पडणार आहे. सरकारने तांदळाची निर्यात बंद केली आहे. काही शेतकी मालावरील आयात शुल्क हटवावे, अशी मागणी उमाटे यांनी केली.