शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन लवकरच मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:38 IST

जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

मुंबई- जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी आणि सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.या प्रकल्पाचा एकूण खर्च 8575 कोटी रुपये इतका असून, जेएनपीटीचा खर्चात वाटा 55 टक्के आहे, तर महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि एसडीसीएल / आयपीआरसीएल प्रत्येकी 15 टक्के भार उचलणार आहेत. या प्रकल्पाचा 50 टक्के मार्ग हा महाराष्ट्रातून जाणार असून, (मालेगाव, न्यू धुळे, नरदाणा, शिरपूर) आणि 50 टक्के मार्ग मध्य प्रदेशातून (मालवण, चितवाल, लोदिपुरा, यशवंत नगर) जाणार आहे.या प्रकल्पामुळे इंदूर आणि जेएनपीटी दरम्यानचे अंतर 200 किमीने कमी होईल, तर मुंबई / पुणे ते मध्य भारतातील प्रमुख शहरातील अंतर 175 किलोमीटरने कमी होईल. हा मार्ग इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे आणि खेड सारख्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या नोड्समधून सुद्धा जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवीन 6000 रोजगार संधी निर्माण होतील.

टॅग्स :railwayरेल्वे