शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

इंदिराजींनी देशाचा लौकीक वाढविला - फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:07 IST

चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची प्रतिमा केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशीच होती. चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला, त्या वेळी ते बोलत होते.‘लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना इंदिराजींनी पंतप्रधान म्हणून देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानपासून असणारा धोका टाळताना त्यांची बांग्लादेशची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना तत्कालिन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना ‘रणचंडिका - दुर्गा’ अशा उपमा दिल्या,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.तसेच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही या वेळी इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. ‘इंदिराजींनी आयुष्यभर गरीब, शोषित, मागास आणि अल्पसंख्यकांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद हा शब्द समाविष्ट करण्यात त्यांचा पुढाकार होता. पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी त्यांना गुंगी गुडिया संबोधले.पण पाकिस्तानचे तुकडे केल्यानंतर त्यांचा दुर्गा म्हणून सर्वत्र गौरवझाला.गुंगी गुडिया से दुर्गा तक का सफरना ही इतना आसान होता है...कभी शक्तिस्थलआकर देखोदेश के लिये खुद को तबाह करनाकितना हसीन होता है.... या पंक्तींनी विखे यांनी भाषणाचा समारोप केला.दरम्यान, देशहितासाठी जोखीम पत्करणाºया प्रसंगी कणखर भूमिका घेऊन देशहित जपणाºया जिगरबाज नेत्या म्हणजे इंदिरा गांधी, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या वेळी इंदिरा गांधी यांचा गौरव केला.‘तुरुंगवास भोगणाºयांना पेंशन’आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांना काही राज्यांत पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्टÑातही अशी योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करेल, असे आश्वासन भाषणाचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी दिले.