शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींनी देशाचा लौकीक वाढविला - फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:07 IST

चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची प्रतिमा केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशीच होती. चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला, त्या वेळी ते बोलत होते.‘लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना इंदिराजींनी पंतप्रधान म्हणून देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानपासून असणारा धोका टाळताना त्यांची बांग्लादेशची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना तत्कालिन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना ‘रणचंडिका - दुर्गा’ अशा उपमा दिल्या,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.तसेच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही या वेळी इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. ‘इंदिराजींनी आयुष्यभर गरीब, शोषित, मागास आणि अल्पसंख्यकांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद हा शब्द समाविष्ट करण्यात त्यांचा पुढाकार होता. पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी त्यांना गुंगी गुडिया संबोधले.पण पाकिस्तानचे तुकडे केल्यानंतर त्यांचा दुर्गा म्हणून सर्वत्र गौरवझाला.गुंगी गुडिया से दुर्गा तक का सफरना ही इतना आसान होता है...कभी शक्तिस्थलआकर देखोदेश के लिये खुद को तबाह करनाकितना हसीन होता है.... या पंक्तींनी विखे यांनी भाषणाचा समारोप केला.दरम्यान, देशहितासाठी जोखीम पत्करणाºया प्रसंगी कणखर भूमिका घेऊन देशहित जपणाºया जिगरबाज नेत्या म्हणजे इंदिरा गांधी, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या वेळी इंदिरा गांधी यांचा गौरव केला.‘तुरुंगवास भोगणाºयांना पेंशन’आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांना काही राज्यांत पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्टÑातही अशी योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करेल, असे आश्वासन भाषणाचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी दिले.