शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींनी देशाचा लौकीक वाढविला - फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:07 IST

चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची प्रतिमा केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशीच होती. चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला, त्या वेळी ते बोलत होते.‘लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना इंदिराजींनी पंतप्रधान म्हणून देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानपासून असणारा धोका टाळताना त्यांची बांग्लादेशची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना तत्कालिन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना ‘रणचंडिका - दुर्गा’ अशा उपमा दिल्या,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.तसेच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही या वेळी इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. ‘इंदिराजींनी आयुष्यभर गरीब, शोषित, मागास आणि अल्पसंख्यकांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद हा शब्द समाविष्ट करण्यात त्यांचा पुढाकार होता. पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी त्यांना गुंगी गुडिया संबोधले.पण पाकिस्तानचे तुकडे केल्यानंतर त्यांचा दुर्गा म्हणून सर्वत्र गौरवझाला.गुंगी गुडिया से दुर्गा तक का सफरना ही इतना आसान होता है...कभी शक्तिस्थलआकर देखोदेश के लिये खुद को तबाह करनाकितना हसीन होता है.... या पंक्तींनी विखे यांनी भाषणाचा समारोप केला.दरम्यान, देशहितासाठी जोखीम पत्करणाºया प्रसंगी कणखर भूमिका घेऊन देशहित जपणाºया जिगरबाज नेत्या म्हणजे इंदिरा गांधी, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या वेळी इंदिरा गांधी यांचा गौरव केला.‘तुरुंगवास भोगणाºयांना पेंशन’आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांना काही राज्यांत पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्टÑातही अशी योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करेल, असे आश्वासन भाषणाचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी दिले.