शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

महाराष्ट्राच्या तिघांना इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर

By admin | Updated: November 2, 2015 03:04 IST

केंद्र सरकारच्या युवक कार्य आणि क्रीडा विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचा सर्वोच्च इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली

मुंबई : केंद्र सरकारच्या युवक कार्य आणि क्रीडा विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचा सर्वोच्च इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महराष्ट्राच्या डॉ. राजेश करपे, सीमा गावडे व विनायक राजगुरु यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनातील दरबार सभागृहामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल.दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने एनएसएसच्या या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा होते. उत्कृष्ट विद्यापीठ, कार्यक्रम अधिकारी किंवा समन्वयक आणि विद्यार्थी अशा तीन विभागांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. यंदा महाराष्ट्राने कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी गटात पुरस्कार पटकावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद येथील डॉ. करपे यांनी एनएसएस कार्यक्रम अधिकारी म्हणून तीन वर्षांत केलेल्या उपक्रमांची दखल घेत, केंद्र सरकारने त्यांची निवड केली. त्याचवेळी शिवाजी विद्यापीठच्या (कोल्हापूर) सीमा गावडे आणि केटीएचएम कॉलेज, नाशिकच्या (पुणे विद्यापीठ) विनायक राजगुरु यांची विद्यार्थी म्हणून केंद्र सरकारने दखल घेतली आहे. या तिन्ही विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आपल्या कार्याची माहिती दिली. आॅगस्टमध्ये मला एनएसएसमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून तीन वर्ष पूर्ण झाली. विद्यार्थी म्हणून एनएसएसशी जोडला गेलो. आजपर्यंत एनएसएसच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून, एनएसएस स्वयंसेवक आणि माझ्या विद्यापीठाचा आहे. त्यांच्याशिवाय हे यश शक्य नव्हते. - डॉ. राजेश करपेएनएसएसच्या या सर्वोच्च पुरस्कारचा आनंद आहेच, शिवाय आता जबाबदारीही वाढली आहे. माझे विद्यापीठ, कॉलेज, शिक्षक आणि मित्र - मैत्रिणी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले. एनएसएसच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा माझा प्रयत्न असेल.- विनायक राजगुरूकेंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे महाराष्ट्र एनएसएसने पार पाडल्या आहेत. दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्याची परंपरा यंदाही कायम राखल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे वर्षभर केलेल्या उपक्रमांची पोचपावती आहे.- अतुल साळुंखे, राज्य संपर्क आणि विशेष कार्यक्रम अधिकारी, एनएसएस, महाराष्ट्र शासन