शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:19 IST

Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल.

नागपूर - जगभरात नॅरेटिव्ह काय बनवायचं हे भारतीय माध्यमे ठरवू शकतात त्याची ताकद येथील माध्यमांमध्ये आहे. नव भारत, सशक्त भारत हा विचार जगभरात देण्याचं काम भारतीय माध्यमे करतील. भारताचा नेरिटिव्ह परदेशी माध्यमे ठरवू शकत नाहीत तर येथील माध्यमे, जनता ठरवतील असं परखड मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑनलाईन बातम्या देणाऱ्यांमध्ये भारत पुढे आहेत. भारतात ज्ञानाची कमतरता नाही. भारताकडे आज सर्वकाही आहे जे विकसित देशांकडे आहे. भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. डिजिटल माध्यमे रिजनल राहिले तर इंटरनॅशनल झालंय. कंटेन्टमध्ये दम असला तर लोकल ते ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाही. जगातील ज्या वृत्तपत्रांना मोठे म्हटले जाते त्यापेक्षा आपला रिच, व्ह्यूअर्स जास्त आहे. भारतीय माध्यमे परदेशी माध्यमांना टक्कर देण्यास कुठेही कमी नाहीत असं त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियाच्या बातम्या ट्रेंड होतातआणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला, त्यावेळी वृत्तपत्रांचा बोलबाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई त्याकाळीही भाजपाने लढली होती. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणापासून हिरावून घेतले जात नाही. टेलिव्हिजनचं युग आले. इंटरनेट आल्यापासून कुणीही पत्रकार होऊ शकते हे कळालं. आज जिथं मीडिया पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग बातम्या होतात. त्या प्रमुख माध्यमांमध्ये झळकतात. भारतातील मीडिया जितका स्वातंत्र्य होता, तो आजही स्वातंत्र्य आहे आणि भविष्यातही स्वातंत्र्य राहील असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

'त्यांना' कोण प्रश्न विचारणार?माध्यमांची भूमिका काय? आणि ते कोण ठरवणार? नेरिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमे करतायेत. १४० कोटींच्या देशात कोण नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतं का? मोदींविरोधात जितका दुष्प्रचार केला जातो त्यातून ते आणखी मजबुतीने उभे राहतात. देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून होतो पण त्यात आता आपले देशातील राजकीय नेतेही त्याचा फायदा घेतात. देशात कोरोना लस निर्माण झाली पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले. भारतात कोट्यवधी लोकं मरतील असा रिपोर्ट आला मग आता त्यांना कुणी प्रश्न विचारणार का? असा सवाल मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला.