शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:19 IST

Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल.

नागपूर - जगभरात नॅरेटिव्ह काय बनवायचं हे भारतीय माध्यमे ठरवू शकतात त्याची ताकद येथील माध्यमांमध्ये आहे. नव भारत, सशक्त भारत हा विचार जगभरात देण्याचं काम भारतीय माध्यमे करतील. भारताचा नेरिटिव्ह परदेशी माध्यमे ठरवू शकत नाहीत तर येथील माध्यमे, जनता ठरवतील असं परखड मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑनलाईन बातम्या देणाऱ्यांमध्ये भारत पुढे आहेत. भारतात ज्ञानाची कमतरता नाही. भारताकडे आज सर्वकाही आहे जे विकसित देशांकडे आहे. भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. डिजिटल माध्यमे रिजनल राहिले तर इंटरनॅशनल झालंय. कंटेन्टमध्ये दम असला तर लोकल ते ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाही. जगातील ज्या वृत्तपत्रांना मोठे म्हटले जाते त्यापेक्षा आपला रिच, व्ह्यूअर्स जास्त आहे. भारतीय माध्यमे परदेशी माध्यमांना टक्कर देण्यास कुठेही कमी नाहीत असं त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियाच्या बातम्या ट्रेंड होतातआणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला, त्यावेळी वृत्तपत्रांचा बोलबाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई त्याकाळीही भाजपाने लढली होती. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणापासून हिरावून घेतले जात नाही. टेलिव्हिजनचं युग आले. इंटरनेट आल्यापासून कुणीही पत्रकार होऊ शकते हे कळालं. आज जिथं मीडिया पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग बातम्या होतात. त्या प्रमुख माध्यमांमध्ये झळकतात. भारतातील मीडिया जितका स्वातंत्र्य होता, तो आजही स्वातंत्र्य आहे आणि भविष्यातही स्वातंत्र्य राहील असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

'त्यांना' कोण प्रश्न विचारणार?माध्यमांची भूमिका काय? आणि ते कोण ठरवणार? नेरिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमे करतायेत. १४० कोटींच्या देशात कोण नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतं का? मोदींविरोधात जितका दुष्प्रचार केला जातो त्यातून ते आणखी मजबुतीने उभे राहतात. देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून होतो पण त्यात आता आपले देशातील राजकीय नेतेही त्याचा फायदा घेतात. देशात कोरोना लस निर्माण झाली पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले. भारतात कोट्यवधी लोकं मरतील असा रिपोर्ट आला मग आता त्यांना कुणी प्रश्न विचारणार का? असा सवाल मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला.