शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:19 IST

Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल.

नागपूर - जगभरात नॅरेटिव्ह काय बनवायचं हे भारतीय माध्यमे ठरवू शकतात त्याची ताकद येथील माध्यमांमध्ये आहे. नव भारत, सशक्त भारत हा विचार जगभरात देण्याचं काम भारतीय माध्यमे करतील. भारताचा नेरिटिव्ह परदेशी माध्यमे ठरवू शकत नाहीत तर येथील माध्यमे, जनता ठरवतील असं परखड मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑनलाईन बातम्या देणाऱ्यांमध्ये भारत पुढे आहेत. भारतात ज्ञानाची कमतरता नाही. भारताकडे आज सर्वकाही आहे जे विकसित देशांकडे आहे. भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. डिजिटल माध्यमे रिजनल राहिले तर इंटरनॅशनल झालंय. कंटेन्टमध्ये दम असला तर लोकल ते ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाही. जगातील ज्या वृत्तपत्रांना मोठे म्हटले जाते त्यापेक्षा आपला रिच, व्ह्यूअर्स जास्त आहे. भारतीय माध्यमे परदेशी माध्यमांना टक्कर देण्यास कुठेही कमी नाहीत असं त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियाच्या बातम्या ट्रेंड होतातआणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला, त्यावेळी वृत्तपत्रांचा बोलबाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई त्याकाळीही भाजपाने लढली होती. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणापासून हिरावून घेतले जात नाही. टेलिव्हिजनचं युग आले. इंटरनेट आल्यापासून कुणीही पत्रकार होऊ शकते हे कळालं. आज जिथं मीडिया पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग बातम्या होतात. त्या प्रमुख माध्यमांमध्ये झळकतात. भारतातील मीडिया जितका स्वातंत्र्य होता, तो आजही स्वातंत्र्य आहे आणि भविष्यातही स्वातंत्र्य राहील असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

'त्यांना' कोण प्रश्न विचारणार?माध्यमांची भूमिका काय? आणि ते कोण ठरवणार? नेरिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमे करतायेत. १४० कोटींच्या देशात कोण नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतं का? मोदींविरोधात जितका दुष्प्रचार केला जातो त्यातून ते आणखी मजबुतीने उभे राहतात. देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून होतो पण त्यात आता आपले देशातील राजकीय नेतेही त्याचा फायदा घेतात. देशात कोरोना लस निर्माण झाली पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले. भारतात कोट्यवधी लोकं मरतील असा रिपोर्ट आला मग आता त्यांना कुणी प्रश्न विचारणार का? असा सवाल मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला.