शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

भौतिकशास्त्रातील नोबेल विजेत्यांना भारतीय शास्त्रज्ञांचेही पाठबळ, संजीव धुरंधर यांचे महत्त्वाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:34 IST

गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे. 

- अविनाश थोरातपुणे -  गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे. 

गुरुत्वीय लहरींच्या भारतात सुरु असणाºया संशोधनामध्ये आणि निरिक्षणामध्ये आयुकाच्या संजीव धुरंधर यांनी मोलाची कामगिरी केली.  धुरंधर हे १९८७ पासून यावर काम करत आहेत, १९८९ मध्ये त्यांनी आयुकामध्ये काम सुरु केले. गोंगाटासारख्या आवजामधून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या तरंगांचे संकेत शोधणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. या प्रकल्पासाठी डाटा अ‍ॅनालिसिसचे कामही त्यांनी केले. धुरंदर यांच्या अनेक विद्यार्थ्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदविला. आयुकातील नऊ शास्त्रज्ञ लिगो  लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरीज) प्रकल्पासाठी काम करत होते. धुरंधर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावरील ७० पेपर्स प्रसिध्द केलेले आहेत. 

‘लोकमत’शी बोलताना संजीव धुरंधर म्हणाले, ‘‘ कोणत्याही शोधासाठी खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणेची गरज असते. लिगो प्रकल्पासाठीही  भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे योगदान राहिले आहे. पण नोबेलविजेत्या  तीन शास्त्रज्ञांचे योगदान मोठे होते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ते या प्रकल्पावर काम करत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी वेचले. 

धुरंधर म्हणाले, ‘‘मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहे. सुरूवातील या प्रकल्पाला कोणीही गांभिर्याने घ्यायला तयार नव्हते. नोबेल मिळाल्याने लायगो इंडियालाही बळ मिळणार आहे. शासन या प्रकल्पाकडे अधिक गांभिर्याने पाहिल. त्यामुळे निधीमध्येही वाढ होईल. सामाजिक पातळीवरही या प्रकल्पाला यश मिळून अधिकाधिक विद्यार्थी या शाखेकडे वळू शकतील.

कल्पनाही केली नाही असे आश्चर्यजनक शोध  लागू शकतात : संजीव धुरंधर

गुरुत्वीय लहरींचा शोध हा शतकातील सर्वात मोठा शोध  आहे.  नोबेल पारितोषिकामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  विश्वाची निर्मिती आणि सुरुवात तसेच इतर अनेक शोधांची वाट या यशामुळे मोकळी झाली आहे.  खगोलविज्ञानाच्या प्रगतीचे नवे दालन यामुळे उघडले आहे. गॅलिलीओच्य काळात आॅप्टीकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी होती. त्यानंतर ७० वर्षांपूर्वी रेडीओ अ‍ॅस्ट्रॉलॉजीचे युग सुरू झाले. त्यामुळे अनेक नवीन शोध लागले. गुरुत्वलहरींच्या शोधांमुळे आता अनेक आश्चर्यजनक शोध लागू शकतात, ज्याची आपण कल्पनाही केली नाही. 

टॅग्स :Puneपुणे