शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

भौतिकशास्त्रातील नोबेल विजेत्यांना भारतीय शास्त्रज्ञांचेही पाठबळ, संजीव धुरंधर यांचे महत्त्वाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:34 IST

गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे. 

- अविनाश थोरातपुणे -  गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे. 

गुरुत्वीय लहरींच्या भारतात सुरु असणाºया संशोधनामध्ये आणि निरिक्षणामध्ये आयुकाच्या संजीव धुरंधर यांनी मोलाची कामगिरी केली.  धुरंधर हे १९८७ पासून यावर काम करत आहेत, १९८९ मध्ये त्यांनी आयुकामध्ये काम सुरु केले. गोंगाटासारख्या आवजामधून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या तरंगांचे संकेत शोधणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. या प्रकल्पासाठी डाटा अ‍ॅनालिसिसचे कामही त्यांनी केले. धुरंदर यांच्या अनेक विद्यार्थ्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदविला. आयुकातील नऊ शास्त्रज्ञ लिगो  लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरीज) प्रकल्पासाठी काम करत होते. धुरंधर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावरील ७० पेपर्स प्रसिध्द केलेले आहेत. 

‘लोकमत’शी बोलताना संजीव धुरंधर म्हणाले, ‘‘ कोणत्याही शोधासाठी खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणेची गरज असते. लिगो प्रकल्पासाठीही  भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे योगदान राहिले आहे. पण नोबेलविजेत्या  तीन शास्त्रज्ञांचे योगदान मोठे होते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ते या प्रकल्पावर काम करत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी वेचले. 

धुरंधर म्हणाले, ‘‘मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहे. सुरूवातील या प्रकल्पाला कोणीही गांभिर्याने घ्यायला तयार नव्हते. नोबेल मिळाल्याने लायगो इंडियालाही बळ मिळणार आहे. शासन या प्रकल्पाकडे अधिक गांभिर्याने पाहिल. त्यामुळे निधीमध्येही वाढ होईल. सामाजिक पातळीवरही या प्रकल्पाला यश मिळून अधिकाधिक विद्यार्थी या शाखेकडे वळू शकतील.

कल्पनाही केली नाही असे आश्चर्यजनक शोध  लागू शकतात : संजीव धुरंधर

गुरुत्वीय लहरींचा शोध हा शतकातील सर्वात मोठा शोध  आहे.  नोबेल पारितोषिकामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  विश्वाची निर्मिती आणि सुरुवात तसेच इतर अनेक शोधांची वाट या यशामुळे मोकळी झाली आहे.  खगोलविज्ञानाच्या प्रगतीचे नवे दालन यामुळे उघडले आहे. गॅलिलीओच्य काळात आॅप्टीकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी होती. त्यानंतर ७० वर्षांपूर्वी रेडीओ अ‍ॅस्ट्रॉलॉजीचे युग सुरू झाले. त्यामुळे अनेक नवीन शोध लागले. गुरुत्वलहरींच्या शोधांमुळे आता अनेक आश्चर्यजनक शोध लागू शकतात, ज्याची आपण कल्पनाही केली नाही. 

टॅग्स :Puneपुणे