शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

अफगाणिस्तान पुनर्उभारणीत भारताने मदत करावी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:16 IST

अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.

मुंबई : अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधील संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हजारो वर्षांपासून उभय देशांमध्ये तसेच लोकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. अलीकडच्या काळात भारत अफगाणिस्तानला माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, रस्ते बांधणी, ऊर्जा संचरण, या क्षेत्रात सहकार्य करत असून उभय देशांमधील राजकीय-आर्थिक संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. अशा प्रकारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू झाल्याबद्दलही सरवर दानिश यांनी समाधान व्यक्त केले.भारतभेटीवर आलेल्या दानिश सरवर यांनी रविवारी (दिनांक १०) महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. अफगाणिस्तान भारताशी आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, सामरिक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक आहे. चाबहार बंदरामुळे व्यापाराला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अफगाणिस्तानातील ५००० विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात शिक्षण घेत असून एकट्या पुणे येथे ३५०० अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत भारताने विद्यार्थी शिष्यवृत्तींची संख्या अधिक वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान भारतासह विविध शहरांमध्ये आगामी काळात संयुक्त सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.भारताचा सच्चा मित्र - राज्यपालअफगाणिस्तान भारताचा सच्चा मित्र राहिला असून अफगाणिस्तानने काबुल तसेच इतर शहरांपासून थेट मुंबईसाठी विमान सेवा सुरू करावी. उभय देशांमध्ये हवाई वाहतूक तसेच चाबहार बंदराच्या माध्यमातून सागरी मार्ग सुरू झाल्यास व्यापार तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी या वेळी केले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र