शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Politics: “ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार, CM असताना एवढा संघर्ष आधी केला असता तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:46 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे अपरिपक्व राजकारणी असून, ते आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

Maharashtra Politics:  आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होत असताना, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकत त्यांनी मिळवली असती, असा टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरून नेला. बाप चोरून नेला नाही तर तुम्ही ज्या बापाचे विचार बाजूला ठेवले ते विचार पुढे नेण्याचे काम शिंदे गट करत असल्याची बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.  उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत, तर हिंदुत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी करतील असा दावा राणा यांनी केला.

उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत

उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व आहे असे वाटत नाही.  बाळासाहेबांनी जे मिळवले, त्याच्या दहा टक्केही उद्धव ठाकरे यांना मिळवता आले नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. 

दरम्यान, नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचे स्वत:वर नियंत्रण राहिले नाही. त्यांनी स्वत:ला सांभाळले पाहिजे. कार्यकर्त्यांना मारणे हा कार्यकर्तांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी ठेवायला हवा असे नवनीत राणा म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना