शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Maharashtra Politics: “ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार, CM असताना एवढा संघर्ष आधी केला असता तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:46 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे अपरिपक्व राजकारणी असून, ते आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

Maharashtra Politics:  आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटाकडून या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होत असताना, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकत त्यांनी मिळवली असती, असा टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणतात बाप चोरून नेला. बाप चोरून नेला नाही तर तुम्ही ज्या बापाचे विचार बाजूला ठेवले ते विचार पुढे नेण्याचे काम शिंदे गट करत असल्याची बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.  उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत, तर हिंदुत्त्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी करतील असा दावा राणा यांनी केला.

उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत

उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व आहे असे वाटत नाही.  बाळासाहेबांनी जे मिळवले, त्याच्या दहा टक्केही उद्धव ठाकरे यांना मिळवता आले नाही. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. 

दरम्यान, नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचे स्वत:वर नियंत्रण राहिले नाही. त्यांनी स्वत:ला सांभाळले पाहिजे. कार्यकर्त्यांना मारणे हा कार्यकर्तांचा अपमान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान त्यांनी ठेवायला हवा असे नवनीत राणा म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना