शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांची लाहीलाही

By admin | Updated: April 3, 2017 02:38 IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्म्याचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन माजी लष्कर पशूवैद्यक व बैलघोडा रूग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी. खन्ना यांनी केले आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याने पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले की, वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांवरही होतो. ड्रीहायड्रेशन, त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते.गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो़ भोवळ येऊन ते पडतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात, मात्र अलीकडे मुंबईतील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.अशी घ्या काळजी! : घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.६८ पशू-पक्षी रुग्णालयात दाखलमागच्या दोन दिवसांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २८ कबूतर, ४ पोपट, १ घुबड, ८ घार, १ बगळा, ३ कावळे, १ पाणकोंबडी, १२ कुत्रे, ८ मांजर आणि २ वासरू दाखल झाल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.रुग्णालयात ‘वॉटरपॉइंट’डॉ. खन्ना यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे बांबूला तीन भांडी अडकवून वॉटरपॉइंट केला आहे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करण्यात आला आहे. यात वॉटरपॉइंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात असेही डॉ. खन्ना यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे निवासी वसाहती, पालिकाने या स्तरांवरही अशा छोट्या-छोट्या वॉटरपॉइंट्सची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली.