शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांची लाहीलाही

By admin | Updated: April 3, 2017 02:38 IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्म्याचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन माजी लष्कर पशूवैद्यक व बैलघोडा रूग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी. खन्ना यांनी केले आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याने पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले की, वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांवरही होतो. ड्रीहायड्रेशन, त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते.गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो़ भोवळ येऊन ते पडतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात, मात्र अलीकडे मुंबईतील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.अशी घ्या काळजी! : घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.६८ पशू-पक्षी रुग्णालयात दाखलमागच्या दोन दिवसांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २८ कबूतर, ४ पोपट, १ घुबड, ८ घार, १ बगळा, ३ कावळे, १ पाणकोंबडी, १२ कुत्रे, ८ मांजर आणि २ वासरू दाखल झाल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.रुग्णालयात ‘वॉटरपॉइंट’डॉ. खन्ना यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे बांबूला तीन भांडी अडकवून वॉटरपॉइंट केला आहे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करण्यात आला आहे. यात वॉटरपॉइंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात असेही डॉ. खन्ना यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे निवासी वसाहती, पालिकाने या स्तरांवरही अशा छोट्या-छोट्या वॉटरपॉइंट्सची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली.