शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांची लाहीलाही

By admin | Updated: April 3, 2017 02:38 IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्म्याचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन माजी लष्कर पशूवैद्यक व बैलघोडा रूग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी. खन्ना यांनी केले आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याने पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले की, वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांवरही होतो. ड्रीहायड्रेशन, त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते.गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो़ भोवळ येऊन ते पडतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात, मात्र अलीकडे मुंबईतील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.अशी घ्या काळजी! : घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.६८ पशू-पक्षी रुग्णालयात दाखलमागच्या दोन दिवसांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २८ कबूतर, ४ पोपट, १ घुबड, ८ घार, १ बगळा, ३ कावळे, १ पाणकोंबडी, १२ कुत्रे, ८ मांजर आणि २ वासरू दाखल झाल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.रुग्णालयात ‘वॉटरपॉइंट’डॉ. खन्ना यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे बांबूला तीन भांडी अडकवून वॉटरपॉइंट केला आहे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करण्यात आला आहे. यात वॉटरपॉइंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात असेही डॉ. खन्ना यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे निवासी वसाहती, पालिकाने या स्तरांवरही अशा छोट्या-छोट्या वॉटरपॉइंट्सची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली.