शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांची लाहीलाही

By admin | Updated: April 3, 2017 02:38 IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्म्याचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन माजी लष्कर पशूवैद्यक व बैलघोडा रूग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी. खन्ना यांनी केले आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याने पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले की, वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांवरही होतो. ड्रीहायड्रेशन, त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते.गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो़ भोवळ येऊन ते पडतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात, मात्र अलीकडे मुंबईतील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.अशी घ्या काळजी! : घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.६८ पशू-पक्षी रुग्णालयात दाखलमागच्या दोन दिवसांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २८ कबूतर, ४ पोपट, १ घुबड, ८ घार, १ बगळा, ३ कावळे, १ पाणकोंबडी, १२ कुत्रे, ८ मांजर आणि २ वासरू दाखल झाल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.रुग्णालयात ‘वॉटरपॉइंट’डॉ. खन्ना यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे बांबूला तीन भांडी अडकवून वॉटरपॉइंट केला आहे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करण्यात आला आहे. यात वॉटरपॉइंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात असेही डॉ. खन्ना यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे निवासी वसाहती, पालिकाने या स्तरांवरही अशा छोट्या-छोट्या वॉटरपॉइंट्सची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली.