शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ

By स्नेहा मोरे | Updated: April 13, 2022 08:31 IST

राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली.

स्नेहा मोरेमुंबई :राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली. त्यामुळेच क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा एकदा यात वाढ झाली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ साली तीन हजार बाल क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०२२ मध्ये तीन महिन्यांत ३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

लहान मुलांना भूक लागत नाही, वजन वाढत नाही, महिनाभराहून अधिक काळ ताप आदी लक्षणांसाठी खासगी डॉक्टरांकडे वा बालरोगतज्ज्ञांकडे आणण्यात आले तर त्वरित क्षयरोग निदान चाचणी व्हायला हवी, असे श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अमित राणावत सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. क्षयरोगाच्या निदान चाचण्या व त्यानंतर नियमावलीनुसार त्वरित उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावतो. तर केवळ औषधे देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

अस्वच्छ वस्त्या, दाट लोकवस्ती, प्रदूषण, कोंदट हवामान, कुपोषण, चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी मुंबईतल्या मुलांना क्षयरोगाची लागण होते. घरात क्षयग्रस्त व्यक्ती असल्यास किंवा तो होण्याची शक्यता असलेल्या परिसरात वावरल्यास लहान मुलांना टीबीचा संसर्ग तत्काळ होतो. कुपोषित आणि अशक्त मुलांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. कैवल्य पुरोहित यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य