शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अ‍ॅट्रॉसिटीसाठी अधिवेशनाची मागणी चुकीची - अविनाश महातेकर

By admin | Updated: September 5, 2016 04:48 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आढावा घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी चुकीची

गौरीशंकर घाळे,

मुंबई- अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आढावा घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी चुकीची असून, ही मागणी घटनेतील तरतुदींशी सुसंगत नसल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकारचा असल्याने राज्यात त्याचा आढावा कसा घेणार, असा सवाल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचे विधान केले होते. याबाबत शनिवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पवारांना लक्ष्य केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याचे पवार म्हणतात, पण राज्यात सर्वाधिक काळ आघाडीचेच राज्य होते. मग, हा अन्याय त्यांनीच केला असे म्हणायचे का, असा सवाल करतानाच अ‍ॅट्रॉसिटीबाबत पवारांनी स्पष्ट बोलावे. पवारांना दोन्ही समाजांना जवळ ठेवायचे आहे व ही त्यांची नीती मराठा समाजाला ठाऊक आहे, असा आरोप करतानाच अ‍ॅट्रॉसिटीसाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलाविण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, उद्धव यांची मागणी चुकीची असल्याची भूमिका रिपाइंने मांडली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारचा नाही. घटनेतील कलमांनी दाखवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे या कायद्याचा आढावा वगैरे घेण्याचा राज्य सरकारला काहीही अधिकार नाही, असा दावा रिपाइं नेते अविनाश महातेकर यांनी केला आहे. अ‍ॅट्रॉसिटीबाबत अधिवेशन बोलावण्याची ठाकरे यांची मागणी चुकीची असली तरी त्यांनी केलेल्या अन्य दोन्ही मागण्यांचा राज्य सरकारने विचार करायला हवा. मराठा समाजातील असंतोषाचा उद्रेक होण्याआधी सरकारने त्यांचे गैरसमज दूर करावेत ही ठाकरे यांची भूमिका रास्त आहे. तसेच मुख्यमंत्री सक्षम असले तरी त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक खात्यांमुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री या मागणीचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तो त्यांच्याच अखत्यारीतील विषय असल्याचे महातेकर यांनी स्पष्ट केले. >मोर्चाचा अधिकार सर्वांना : मराठा समाजाच्या निघणाऱ्या मोर्चांवर केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी, कोणत्याही स्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ देणार नाही, मोर्चा काढण्याचा अधिकार ज्याप्रमाणे मराठा समाजाला आहे, त्याप्रमाणे अन्य समाजांनाही आहे, असे मत व्यक्त केले होते.