शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

अ‍ॅट्रॉसिटीसाठी अधिवेशनाची मागणी चुकीची - अविनाश महातेकर

By admin | Updated: September 5, 2016 04:48 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आढावा घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी चुकीची

गौरीशंकर घाळे,

मुंबई- अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आढावा घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी चुकीची असून, ही मागणी घटनेतील तरतुदींशी सुसंगत नसल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकारचा असल्याने राज्यात त्याचा आढावा कसा घेणार, असा सवाल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचे विधान केले होते. याबाबत शनिवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पवारांना लक्ष्य केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याचे पवार म्हणतात, पण राज्यात सर्वाधिक काळ आघाडीचेच राज्य होते. मग, हा अन्याय त्यांनीच केला असे म्हणायचे का, असा सवाल करतानाच अ‍ॅट्रॉसिटीबाबत पवारांनी स्पष्ट बोलावे. पवारांना दोन्ही समाजांना जवळ ठेवायचे आहे व ही त्यांची नीती मराठा समाजाला ठाऊक आहे, असा आरोप करतानाच अ‍ॅट्रॉसिटीसाठी राज्य विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलाविण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, उद्धव यांची मागणी चुकीची असल्याची भूमिका रिपाइंने मांडली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारचा नाही. घटनेतील कलमांनी दाखवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे या कायद्याचा आढावा वगैरे घेण्याचा राज्य सरकारला काहीही अधिकार नाही, असा दावा रिपाइं नेते अविनाश महातेकर यांनी केला आहे. अ‍ॅट्रॉसिटीबाबत अधिवेशन बोलावण्याची ठाकरे यांची मागणी चुकीची असली तरी त्यांनी केलेल्या अन्य दोन्ही मागण्यांचा राज्य सरकारने विचार करायला हवा. मराठा समाजातील असंतोषाचा उद्रेक होण्याआधी सरकारने त्यांचे गैरसमज दूर करावेत ही ठाकरे यांची भूमिका रास्त आहे. तसेच मुख्यमंत्री सक्षम असले तरी त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक खात्यांमुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री या मागणीचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तो त्यांच्याच अखत्यारीतील विषय असल्याचे महातेकर यांनी स्पष्ट केले. >मोर्चाचा अधिकार सर्वांना : मराठा समाजाच्या निघणाऱ्या मोर्चांवर केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी, कोणत्याही स्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ देणार नाही, मोर्चा काढण्याचा अधिकार ज्याप्रमाणे मराठा समाजाला आहे, त्याप्रमाणे अन्य समाजांनाही आहे, असे मत व्यक्त केले होते.