शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कृतीत साम्य, वागण्यात विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:22 IST

काँग्रेसला महाराष्ट्रात १९७२ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर त्या वेळचे मातब्बर पक्षनेते व ज्येष्ठ मंत्री राजारामबापू पाटील यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले. सगळ्यांना अनपेक्षित असा हा निर्णय होता. मात्र तो निर्णय शिरसावंद्य मानून बापूंनी आपले विधानसभेतील कामकाज जोरकसपणे चालू ठेवले.

- दिनकर रायकरकाँग्रेसला महाराष्ट्रात १९७२ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर त्या वेळचे मातब्बर पक्षनेते व ज्येष्ठ मंत्री राजारामबापू पाटील यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले. सगळ्यांना अनपेक्षित असा हा निर्णय होता. मात्र तो निर्णय शिरसावंद्य मानून बापूंनी आपले विधानसभेतील कामकाज जोरकसपणे चालू ठेवले.आपण मंत्री झालो नाही, याचे शल्य मनात जरी असले तरी ते त्यांनी त्यांच्या वागण्याबोलण्यातून तसूभरही कळू दिले नाही. तीच कडक इस्त्रीची टोपी, पांढरा शुभ्र स्टार्च केलेला झब्बा, त्यावर पांढºया रंगाचे जॅकेट आणि बारीक काठाचे स्वच्छ धोतर अशा पेहरावात ते विधिमंडळात ऐटीत यायचे. कामकाजात भाग घ्यायचे. सकाळी अधिवेशन सुरू होताना आलेले बापू सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत सक्रिय सहभागी व्हायचे. प्रत्येक गोष्टीत अभ्यास करून, विधिमंडळाच्या प्रत्येक आयुधाचा योग्य पद्धतीने वापर करत ते नेमके व टोकाचे प्रश्न विचारायचे. स्वत:च्याच पक्षाचे सरकार आहे, मी प्रश्न कसे विचारू, असा भाव त्यांच्या मनातही नसायचा, पण त्याचवेळी मी तुम्हाला आता बघा, कसा अडचणीत पकडतो असा आविर्भावही नसायचा. त्यांच्या मुद्देसूद भाषणानंतर, प्रश्न मांडल्यानंतर विरोधी बाकावरील सदस्य बाके वाजवून त्यांचे स्वागत करायचे. विरोधकांना साजेसे पण स्वत:च्या पक्षावर कोणतीही टीका न करता ते व्यवस्थेवर बोलायचे, व्यवस्थेतील चुका नेमकेपणाने दाखवून द्यायचे. मंत्रीदेखील त्यांच्या प्रश्नांना तेवढ्याच उमदेपणाने उत्तरं द्यायचे. कॉलिंग अटेन्शनपासून ते प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, औचित्याचे मुद्दे अशी एक ना दोन; अनेक आयुधे वापरून सरकारच्या कामकाजावर बापू अत्यंत नेमकेपणे बोट ठेवायचे. सरकारची अनेकदा कोंडीहीव्हायची. पण बापू आपले मुद्देसोडायचे नाहीत. आणीबाणीनंतर १९७७ ला लोकसभा निवडणुका आल्या. त्याच काळात ‘काँग्रेस फॉर डेमॉक्रसी’ (सीएफडी) हा पक्ष जगजीवनराम यांनी इंदिरा गांधी यांना विरोध करण्यासाठी स्थापन केला. त्या पक्षात राजारामबापू सहभागी झाले, पक्षाचे राज्याचे अध्यक्षही झाले. अपेक्षेप्रमाणे त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा देशभर पराभव झाला तसा तो राज्यातही झाला. काँग्रेसच्या पराभवात राजारामबापूंचा वाटा मोठा होता. याच निवडणुकीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी जनता पक्ष स्थापन केला होता. ज्यात डाव्यांपासून उजव्यांपर्यंत सर्व विरोधी पक्ष त्या आघाडीत सहभागी झाले होते. तसाच सीएफडीही सहभागी झाला. त्यानंतर वर्षभरात राज्यात निवडणुका झाल्या व १९७८ साली राज्यात ‘पुलोद’चे सरकार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले, त्यात बापू मंत्री झाले..!आज हे सगळे आठवण्याचे कारण ठरले ते भाजपाचे एक वरिष्ठ नेते, माजी महसूलमंत्री व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांचे वागणे. राजारामबापू आणि खडसेंच्या कृतीत सकृतदर्शनी साम्य दिसत असले तरी वागण्यात मात्र साधर्म्य नाही. बापू कोठेही न चिडता, कोणताही आव न आणता विधानसभेत अखंडपणे हजर राहून नेटाने सरकारविरोधी किल्ला लढवायचे. खडसे मात्र कधी सभागृहात दिसतात, तर कधी नाही. शिवाय विधिमंडळाची आयुधे वापरण्यापेक्षाही ‘मी आता तुम्हा एकेकांना बघतोच...’ हा आविर्भाव जास्त दिसतो. सरकारवरची त्यांची टीका मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांकडे जास्त सरकणारी दिसते. आता आपली मंत्रिमंडळात वर्णी लागत नाही हे लक्षात आल्यानंतर ते स्वत: मी मंत्रिमंडळात येणार नाही, असेही सांगू लागले आहेत. त्या वेळी राजारामबापूंनी शरद पवारांशी हातमिळवणी केली होती, आता खडसे अजितदादांसोबत स्टेजवर दिसू लागले आहेत. बापूंविषयी जशी सहानुभूती त्या वेळच्या काही मोजक्या मंत्र्यांमध्ये असायची तीच सहानुभूती आज खडसेंच्या बाबतीत काही मंत्र्यांमध्ये दिसते, पण त्याचा जो फायदा बापूंना झाला तो खडसेंना होईलच असे नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र