शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात सरकारने मूळ प्रश्नांपासून काढला पळ, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:09 IST

या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.   

मुंबई : अधिवेशन सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केला. पण मूळ प्रश्नांपासून सरकारने पळ काढला. हे सरकार व्यक्तिगत हितासाठी काम करते आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.

राज्यात काही भागांत अतिवृष्टी, काही भागांत दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण शासनाने त्यांना काहीच मदत जाहीर केलेली नाही. हे फक्त घोषणाबाज सरकार आहे. 

ट्रीपल इंजिन सरकार म्हणतात, दोन इंजिन असले की गाडी सरळ चालते. मात्र, इंजिन कोणत्या दिशेला जाते कळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.  

९० मतदारसंघात निधी का नाही?राज्यात २८८ पैकी ९० मतदारसंघात सरकारने कोणताही विकासनिधी दिलेला नाही. या मतदारसंघातील जनताही कर भरते, त्यामुळे त्यांचा विकासाचा अधिकार आहे, पण तो दाबण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही यावेळी विरोधकांनी केली. 

श्वेतपत्रिका नाही, काळी पत्रिका : दानवे वेदांत-फॉक्सकॉनबरोबर अनेक बैठका होऊन करारनाम्याचा मसुदा तयार झाला होता. टाटा एअर बसचा प्रकल्पही महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रकल्प राज्यात होणार, असे जाहीर केले होते. हे प्रकल्प जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळात गुजरातला नेण्यात आले.  त्यांनी श्वेतपत्रिका नाही, तर काळी पत्रिका मांडली, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवे