शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

राजकारणात कोणी कायमचा शत्रू-मित्र नसतो! अजित पवार बोलून गेले, दुसऱ्याच क्षणी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 08:03 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान अन् सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई : राजकारणात कोणी कायमचे शत्रू वा मित्र नसते, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आपल्या या विधानाचा वेगळा काही अर्थ काढू नका, असे पवार यांनी स्वत:च स्पष्ट केले.विधिमंडळ अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. त्यानी ईडी वापरली तर तुम्ही पोलीस वापरायचे हे योग्य वाटते काय, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कोणतेही सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असते. सत्तापक्ष आणि विरोधक  दोघांनी एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे.  कोणी कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र नसतो असे सांगताना त्यांनी, १९९५ पासून राज्यात बदलत गेलेल्या राजकीय जोड्यांचा संदर्भ दिला. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. सूडभावनेने अशा कारवाया करण्याची राज्याची परंपरा नाही. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, असेही ते म्हणाले.विधानसभाध्यक्ष निवड राज्यपालांच्या अनुमतीनेच विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनातही होवू शकली नाही. पुढील अधिवेशनात तरी ती होणार का, या प्रश्नात त्यांनी राज्यपालांच्या अनुमतीशिवाय ही निवड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. या परवानगीशिवाय निवड करायची असा विचार आमच्यात झाला होता पण शेवटी राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करायची नाही, असे ठरल्याचे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार