शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

शुल्क नियंत्रण कायदा सुधारणार

By admin | Updated: May 16, 2017 03:05 IST

कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करता येऊ नये, यासाठी शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा केली जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करता येऊ नये, यासाठी शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा केली जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले, तसेच नफेखोरी झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित शाळा व शिक्षण संस्थांना वटणीवर आणण्यात येईल, असा इशाराही तावडे यांनी दिला. पुण्यामधील १८ शाळांपैकी सहा शाळांची सुनावणी सोमवारी शिक्षणमंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या वेळी शाळांमधील फी वाढीसंबंधी अनेक मुद्दे पालकांनी उपस्थित केले, तर संस्थाचालकांनी त्या संदर्भात आपल्या अडचणी व आपली बाजू मांडली. पालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेरेंटन्स टीचर असोसिएशन (पीटीए)च्या अनुमतीने ज्या शाळांमध्ये फी वाढ करण्यात आली, त्या शाळांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले. अवास्तव फी वाढीसंदर्भात पालक शुल्क नियंत्रण समितीकडे दाद मागू शकतात, परंतु सध्याच्या शुल्क नियंत्रण कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात काही शाळांची फी वाढीच्या विषयावर समिती समोर सुनावणी होणार असून, या वेळी संबंधित कायद्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव असावा, याबाबत पालक आपले म्हणणे सविस्तरपणे मांडणार आहेत, शासनाच्या वतीनेही काही सूचना समितीकडे देण्यात येतील, असेही तावडे यांनी सांगितले.सिस्कॉनचा अहवाल सादरराज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक खासगी शाळांच्या शुल्कवाढीवर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी सिस्कॉन संघटनेने सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे. शुल्क रचनेत सुधारणा सुचविणारा अहवालही सिस्कॉनने शासनाला सादर केला आहे. हा अहवाल संस्थेने जनतेसाठी खुला केला असून, अहवालातील मुद्द्यांची शासनाने गंभीर दखल घेण्याचे आवाहनही सिस्कॉनने केले आहे. सिस्कॉनचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले, ‘अनुदानित आणि शासकीय शाळांवर शासन ज्याप्रकारे नियंत्रण ठेवते, त्याचप्रकारे शासनाने नागरिकांचे प्रतिनिधित्व करत, खासगी शाळांवरही अंकुश ठेवण्याची गरज आहे. नेमका हाच मुद्दा अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. ज्याप्रकारे शासकीय आणि अनुदानित शाळांचे परीक्षण शासन करते, त्याचप्रमाणे आता खासगी शाळांचे परीक्षणही शासकीय अधिकाऱ्यांनी करावे. सोबतच शुल्क देऊन शाळा चालवणाऱ्या पालकांसाठी ही सर्व माहिती पारदर्शकपणे खुली असावी. याउलट सद्यस्थितीत बहुतेक शाळा कोणतीही बहुतेक शाळा या राज्यकर्त्यांच्याच आहेत. त्यामुळे शासनाने पालकांचे प्रतिनिधित्व करत, या शाळांवर अंकुश ठेवण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे.