शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

छुप्या पद्धतीने दारूविक्री तेजीत

By admin | Updated: April 5, 2017 01:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेल्या दारू विक्रीचे हॉटेल, दुकाने बंद झाल्याने अवैध दारूविक्री तेजीत सुरू आहे

बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेल्या दारू विक्रीचे हॉटेल, दुकाने बंद झाल्याने अवैध दारूविक्री तेजीत सुरू आहे. बारामती शहरात फक्त दोन हॉटेल या मार्गांपासून दूर आहेत. तेथे मद्यपींची अगदी सकाळपासूनच गर्दी होत आहे. तर देशी दारूचीही चढ्या दराने विक्री होत आहे. दारूबंदीचा असाही फायदा आता अवैध दारूविक्री करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. बारामती शहरातील जवळपास ८० ते ८५ हॉटेल्स, दारू दुकाने बंद झाली आहेत. आता शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर जिल्हा मार्गांमध्ये करून नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील दुकानांना अभय मिळेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यापासून ५०० मीटरची मर्यादा मद्यविक्रीच्या दुकानांना, हॉटेल्सला घातली आहे. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून मार्ग काढत देशी दारूविक्रीचे परवाने असलेल्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तर अवैध गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. फक्त दोन हॉटेल्स ५०० मीटरच्या लांबीवर आहेत. जादा दराने दारू विक्री खुले आम होत आहे. शहरातील ८५ हॉटेल्समधील कामगारांना त्याचा फटका बसला आहे. बारामती रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल झगडे यांनी सांगितले, की आता मद्यविक्री बंद झाल्यामुळे हॉटेल्समध्ये फक्त जेवणाची सोय आहे. त्यामुळे कामगार कपात करावी लागली आहे. त्याचबरोबर व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे. दरम्यान, झोपडपट्टीबहूल भागात हातभट्टी दारूची विक्री वाढली आहे. त्यावर मात्र, उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याचे चित्र आहे. कायदेशीर परवाने घेऊन मद्यविक्री करणाऱ्यांवर बंधने घातली जात असताना छुप्या पद्धतीने होत असलेल्या दारूविक्रीवर, हातभट्टी विक्रीवरदेखील कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते.(प्रतिनिधी)बेकायदेशीर मद्यविक्री खुलेआमकोरेगाव मूळ : सरकारने नुकत्याच महामार्गापासून पाचशे मीटर आतील अंतरावर असलेल्या वाइन शॉप, परमिटरूम आणि बिअर शॉपीवर स्थगिती आणल्यामुळे पूर्व हवेली तालुक्यात सामान्य जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. खऱ्या अर्थाने महिलावर्गाने न्यायालयाचे अभिनंदन केले आहे. ५०० मीटरच्या पुढे बांधकाम?न्यायालयाच्या निर्णयाच्या झटक्याने दारुविक्रीची कमाई ठप्प झाली आहे. दारूबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पळवाटा काढण्यात तरबेज असलेल्या व्यावसायिकांनी महामार्गापासून आपली हॉटेल व दुकाने ५०० मीटरच्या पुढे नेऊन बांधकाम करण्याचा तत्काळ निर्णय घेतला आहे. ... तरच दारूबंदी यशस्वीदेशी-विदेशी दारूअड्डे जागोजागी उपलब्ध आहेत. यासाठी स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तरी त्याची कठोर अमलबजावणी व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोरपासून उरुळी कांचन दरम्यान वाईन शॉप आणि परमिट रूम हॉटेल्स आहेत. हवेली तालुक्यातील या भागात फुटाफुटावर असणाऱ्या बेकायदा हॉटेल व धंद्यांवर खुलेआम मद्यविक्री केली जाते. यामुळे अनेकांना दारू पिऊन आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात तरी अपघातांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. दारुबंदीची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली तरच हे साध्य होऊ शकणार आहे. सध्यातरी खुलेआम विक्रीमुळे ते होताना दिसत नाही. दारूची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच दारूची बॅनर्स आणि जाहिरातीही काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य सचिव आणि राज्य पोलीसप्रमुखांवर असेल, असेही न्यायालयाने सांगितले आहे.मद्यविक्री बंदच्या या निर्णयाचे जनतेने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. खऱ्या अर्थाने महिलावर्गात विशेष स्वागत व न्यायालयाचे अभिनंदन झाले, परंतु न्यायालयाने महिलांची मुख्य अडचण म्हणजे विनापरवानाधारक म्हणजे अवैध धंदे समूळ नष्ट होणे, ही काळाची गरज असल्याचे न्यायालयाने समजून घ्यावे, अशी मुख्य मागणी महिलावगार्तून होऊ लागली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उरुळी कांचन हे गाव असून या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावात बेकायदेशीर दारूधंद्याना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून, हॉटेलमध्ये मुबलक प्रमाणात दारू मिळते. सरकारने महामार्गालगत असलेली मद्याची दुकाने बंद केली, पण बेकायदेशीर दारू कधी बंद होईल, हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेसमोर आहे.