शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य विवाद धोरणाची आठ महिन्यांत अंमलबजावणी

By admin | Updated: October 9, 2014 00:52 IST

विवाद धोरणाची (लिटिगेशन पॉलिसी) आठ महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक

हायकोर्टात शासनाची ग्वाही : जनहित याचिका निकाली नागपूर : विवाद धोरणाची (लिटिगेशन पॉलिसी) आठ महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांनी ही बाब लक्षात घेता संबंधित जनहित याचिका निकाली काढली.राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने गेल्या २७ आॅगस्टपासून विवाद धोरण लागू केले आहे. विवाद धोरणांतर्गत राज्य, विभाग व जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना व मध्यस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी थोडा वेळ लागणार असल्यामुळे धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आठ महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे, असे सरकारी वकील भारती डांगरे यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांची विनंती मंजूर केली. राज्य शासनाकडून त्यांच्याविरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांवर धोरणामुळे ‘ब्रेक’ लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.कनिष्ठ न्यायालये किंवा लवादांनी विरोधात निर्णय दिल्यास राज्य शासन बाजू बळकट नसतानाही वरिष्ठ न्यायालयात अपील करत होते. शासन गरज नसताना न्यायालयांवरील कामाचे ओझे वाढवित असल्याची व सार्वजनिक निधीचा अपव्यय करीत असल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने ‘राज्य शासन वि. राजेंद्र टापर’ प्रकरणात शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. ४ आॅगस्ट रोजी न्यायालयाने राज्यात विवाद धोरण लागू करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारण्याचे निर्देश प्रबंधन कार्यालयाला दिले होते. (प्रतिनिधी)धोरणातील तरतुदीधोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येईल.सरकारी वकिलांसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात किमान एका मध्यस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. अनावश्यक तहकुबी टाळण्यासाठी सरकारी वकील व प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये आंतरसंवादाची प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. अपील दाखल करण्यापूर्वी वादग्रस्त आदेश रद्द करण्याकरिता एखादा अर्ज करणे योग्य ठरेल काय यावर सर्वप्रथम विचार करण्यात येईल. फौजदारी प्रकरणांसाठी अतिरिक्त जलदगती न्यायालये व संवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल.