शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राज्य विवाद धोरणाची आठ महिन्यांत अंमलबजावणी

By admin | Updated: October 9, 2014 00:52 IST

विवाद धोरणाची (लिटिगेशन पॉलिसी) आठ महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक

हायकोर्टात शासनाची ग्वाही : जनहित याचिका निकाली नागपूर : विवाद धोरणाची (लिटिगेशन पॉलिसी) आठ महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांनी ही बाब लक्षात घेता संबंधित जनहित याचिका निकाली काढली.राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने गेल्या २७ आॅगस्टपासून विवाद धोरण लागू केले आहे. विवाद धोरणांतर्गत राज्य, विभाग व जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना व मध्यस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी थोडा वेळ लागणार असल्यामुळे धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आठ महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे, असे सरकारी वकील भारती डांगरे यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांची विनंती मंजूर केली. राज्य शासनाकडून त्यांच्याविरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांवर धोरणामुळे ‘ब्रेक’ लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.कनिष्ठ न्यायालये किंवा लवादांनी विरोधात निर्णय दिल्यास राज्य शासन बाजू बळकट नसतानाही वरिष्ठ न्यायालयात अपील करत होते. शासन गरज नसताना न्यायालयांवरील कामाचे ओझे वाढवित असल्याची व सार्वजनिक निधीचा अपव्यय करीत असल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने ‘राज्य शासन वि. राजेंद्र टापर’ प्रकरणात शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. ४ आॅगस्ट रोजी न्यायालयाने राज्यात विवाद धोरण लागू करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारण्याचे निर्देश प्रबंधन कार्यालयाला दिले होते. (प्रतिनिधी)धोरणातील तरतुदीधोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात येईल.सरकारी वकिलांसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात किमान एका मध्यस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. अनावश्यक तहकुबी टाळण्यासाठी सरकारी वकील व प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये आंतरसंवादाची प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. अपील दाखल करण्यापूर्वी वादग्रस्त आदेश रद्द करण्याकरिता एखादा अर्ज करणे योग्य ठरेल काय यावर सर्वप्रथम विचार करण्यात येईल. फौजदारी प्रकरणांसाठी अतिरिक्त जलदगती न्यायालये व संवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल.