शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मी शिक्षक नव्हे, तर शिक्षणमंत्री! - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:58 IST

मी शिक्षणमंत्री आहे, शिक्षकमंत्री नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केले.

पुणे : वेतनश्रेणीबाबतच्या निर्णयासाठी शिक्षक संघटनांकडून मोर्चे काढण्यात आले. मात्र, नोकरीच्या कालावधीत १२ आणि २४ वर्षांनंतर वेतनवाढ हवी असेल, तर शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निकष सिद्ध करावे लागतील. मी शिक्षणमंत्री आहे, शिक्षकमंत्री नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केले.शासनाकडून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तावडे म्हणाले, शिक्षकांवर आॅनलाइन कामाचा भार पडत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. आठ-दहा दिवसांमध्ये अहवाल आल्यानंतर कामाचा भार कमी करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल. शालेय पोषण आहार योजनेबाबत जुनी यंत्रणा राबवण्याचा निर्णय झाला असून, निविदेची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास खात्यामार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाइन प्रक्रिया उन्हाळी सुट्टीनंतर राबवली जाणार असल्याने शिक्षकांना वेळ मिळेल.उच्च शिक्षण संचालकांना क्लीन चिटआमदारांच्या रोषामुळे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या निलंबनाचे आदेश दिले. मात्र, समितीद्वारे चौकशी केल्यानंतर ते दोषी नसल्याचे पुढे आल्याने निलंबनाची कारवाई केली नसल्याचा खुलासा तावडे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१३-१४ मध्ये १४० शिक्षकेतर पदांची भरती झाली होती. तेव्हा कुलसचिवपदी डॉ. माने कार्यरत होते. वर्ग-३ व ४ साठी कुलसचिव हे नियुक्ती अधिकारी होते. भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना आ. संजय शिरसाठ यांनी केला होता.दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी शासनातर्फे आग्रह धरण्यात आला आहे, मात्र त्याची सक्ती नाही. ८५ टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढून झाली आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे