शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

...मी देशभक्त नव्हे देशप्रेमी - कन्हैया कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 16:57 IST

देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.  देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे  विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देदेशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.   मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्थाना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे.   कलयुगातील कन्हैया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ रोखणार असल्याचा दुर्दम्य आशावाद कन्हैयाने यावेळी व्यक्त केला. विविध चळवळींना एका सूत्रात जोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिले

औरंगाबाद, दि. ७ : देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे.  देशभक्त म्हटले की, त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद केला जातो. मात्र प्रेम असा शब्द आहे की, त्यात सर्व काही समान असते. यामुळे मी देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचे  विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.

कन्हैया कुमार लिखित ‘बिहार से तिहार’ या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यगृहात कन्हैया कुमार यांच्या हस्ते पार पडले. तेव्हा त्यांनी उपस्थित श्रोत्यांशी मुक्तसंवाद साधला. मागील तीन वर्षांपासून देशभरातील महत्वाच्या शिक्षण संस्थाना केंद्र सरकारने टार्गेट केले आहे.  शिक्षणव्यवस्था उधवस्त केल्यास गरीब, दलीत, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शिकणार नाहीत. या षडयंत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींमध्ये कपात, बंद करण्यापासून झाली. या विरोधात पहिल्यांदा हैदराबाद विद्यापीठात आवाज उठवला.  या विद्यापीठात कार्यरत असलेल्या आंबेडकरवादी विद्यार्थी चळवळ संघटनेचा नेता रोहीत वेमूला याला यासाठी जबाबदार धरले. यातून त्याचा मानसिक छळ सुरू केला. हा छळ रोहीतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यापर्यंत गेला. त्यामुळे ती आत्महत्या नव्हे तर या व्यवस्थेने केलेली नियोजित हत्याच असल्याचे कन्हैया कुमार यांनी सांगितले. 

यानंतर जेएनयू विद्यापीठाकडे लक्ष वळविण्यात आले. त्याठिकाणच्या विचारांना संपविण्यासाठी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे फेक व्हिडिओ समोर आणला. त्यातुन आम्हाला देशद्रोही ठरवले. मात्र आता त्या घटनेला १६ महिने झाले तरी अद्याप आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत. यातुन संघाला केवळ देशात मनुवाद आणायचा आहे. यासाठीच शिक्षण संस्थांवर सुनियोजित हल्ले सुरू केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. भालचंद्र कांगो यांनी अध्यक्षीय समारोप केला. या पुस्तकाच्या अनुदावर लेखक व कवी  डॉ. गणेश विसपुते यांनी भाष्य केले. पुस्तकाच्या अनुवादामागची भूमिका अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे यांनी मांडली. डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार रामप्रसाद वाहूळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता क्रांतीगीत आणि राष्ट्रगिताने झाली.

मोदींचा रथ रोखणारचपुराणात कन्हैयाने अर्जूनाच्या रथाचे सारथ्य करत युध्द जिंकण्यात महत्वाचा भूमिका बजावली होती. मात्र हा कलयुगातील कन्हैया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ रोखणार असल्याचा दुर्दम्य आशावाद कन्हैयाने यावेळी व्यक्त केला. सध्या मोदी अपराजित असल्याचे सांगतात. त्यांचा कधीही पराभव होणार नसल्याचेही बोलतात. हुकूमशाह हिटलरच्या बाबतीत ही असेच बोलले जात होते. मात्र इतिहास काय सांगतो ते आपण तपासले पाहिजे. माझे मोदींना आव्हान आहे. त्यांनी जेएनयूमध्ये विद्यार्थी निवडणूकीला उभे राहून जिंकून यावे. मात्र त्यासाठी किमान जेएनयूमध्ये प्रवेश तरी घ्यावा. ही पात्रता पूर्ण करू शकतात का? हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार सर्व पातळ्यावर अपयशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने तपासा. प्रत्यक्ष सत्तेवर आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तपासा. प्रत्येक गोष्टीत अपयश आल्याचे दिसून येईल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कोणत्याही बाबींचा देशभक्तीसोबत संबंध जोडत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचे कन्हैयाने सांगितले.

व्हाट्सअप विद्यापीठातून बदनामीची मोहिमनागपूरच्या संघ विचारधारेत प्रथम व्यक्ती, संस्थांना बदनाम करण्याची मोहिम राबविण्यात येते. माझ्या बदनामीसाठी तर व्हाट्सअप विद्यापीठाचा वापर केला. माझे कुटुंब, नातेवाईक यांच्यावर खुप लिहून आले. मात्र माझा जन्म हा स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात झालेला आहे. माझी आई आंगणवाडीची सेविका आहे. तर माझ्या कुटुंबातील १६ जण सीमेवर देशाची सेवा करत असल्याचेही कन्हैयाने सांगितले.

या कारणांसाठी लिहिले आत्मचरित्रआत्मचरित्र लिहिण्याचे माझे वय नाही. मात्र शिक्षण संस्थांवर होणारे हल्ले, चळवळीला बदनाम करण्याचे रचलेले षडयंत्र आणि एकाच ध्येयासाठी लढणा-या विविध चळवळींना एका सूत्रात जोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिले असल्याचे कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केले.