शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 01:56 IST

‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ यावर राष्ट्रीय कार्यशाळा

पुणे : दहशतवादाचे स्वरूप आज बदलत आहे. दहशत पसरविण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर केला जात आहे. कट्टरतावाद तसेच धार्मिकतेचा प्रसार इंटरनेटद्वारे केला जात आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेचे जमिनीवरील अस्तित्व आज संपुष्टात येत आहे. मात्र, इंटरनेटवर आजही त्यांचे मोठे अस्तित्व आहे. त्यांचे हे वाढते अस्तित्व चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले.राष्ट्रीय रक्षा अनुसंधान संस्थेच्या (डीआरडीओ) अतिउच्च पदार्थविज्ञान संस्था (एचईएमआरएल) या प्रयोगशाळेतर्फे ‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कुलकर्णी बोलत होते.याप्रसंगी एचईएमआरएलचे डायरेक्टर के. पी. एस. मूर्ती, आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. पी. के. मेहता, भोपाळ येथील आयसर संस्थेचे संचालक डॉ. उमापती, एआरडीएचे प्रमुख डॉ. रमण, लष्करी अभियांत्रिकी विद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले, की १९९३ पासून देशात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र सर्वाधिक होरपळला आहे. गेल्या दशकात पुण्यात तीन वेळा बॉम्बस्फोट झाले आहेत. दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबविणे हे सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांतर्फे दहशत पसरविण्यासाठी विविध प्रकारच्या स्फोटकांचा वापर केला जातो. या स्फोटकांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. या स्फोटकांचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे गरजेचे आहे. या चर्चासत्रातून या प्रकारच्या संशोधनावर चर्चा होईल. स्फोटके बनविण्याची माहिती इंटरनेटवर सहजासहजी उपलब्ध आहे. याचा वापर करून स्फोटके बनविली जात आहेत. अशा दहशतवाद्यांना थांबविणे, तसेच त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक काम आहे.दहशतवादी संघटनांकडून प्रेरित झालेल्यांचा शोघ घेणे मोठे आव्हान दहशतवादाचा चेहरा आज बदलला आहे. इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे कट्टरपंथीय आपले विचार पसरवीत आहेत. या विचारांनी अनेक तरुण प्रभावित होत आहेत. कुठल्याही संघटनेशी संबंध न ठेवता ते स्वयंप्रेरणेने दहशतवादी कारवाया करीत आहेत. यामुळे त्यांचा शोध घेणे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. फ्रान्समध्ये याचे प्रमाण जास्त आहे. येत्या काळात भारतातही अशा कारवाया होण्याची शक्यता आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.२५ प्रकारच्या स्फोटकांचा शोध घेणाऱ्या भारतीय बनावटीच्या ओआरएक्स रिव्हेलेटरचे अनावरणडीआरडीओ आणि एचईएमआरएलच्या शास्त्रज्ञांनी अतिउच्च दर्जाची स्फोटके बनविण्यासाठी ‘ओआरएक्स रिव्हेलेटर’ ही यंत्रणा तयार केली आहे. याद्वारे २५ वेगवेगळ्या स्फोटकांचा शोध घेतला जाऊ शकतो. विमानतळ, बसस्थानक तसेच आदी ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येणार आहे. तसेच मोठी घटना होण्याआधीच ती थोपविणे शक्य होणार आहे. या यंत्रणेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.दहशतवाद हा सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. अत्याधुनिक स्फोटकांचा आज मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही स्फोटके शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. विमानतळ, बसस्थानक, प्रवासी जहाजे, तसेच मोठे कंटेनर या ठिकाणी स्फोटके तपासण्यासाठी अतिउच्च दर्जाची यंत्रणा आवश्यक असते. या कार्यशाळेत यावर चर्चा होईल आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.- डॉ. पी. के. मेहता, प्रमुख,आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंगभारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताचे शेजारी हे मैत्रीपूर्ण नाहीत. यामुळे देशाला आर्थिक प्रगती साधताना अनेक अडथळे येतात. देशात अशांतता पसरविण्यासाठी अनेक घटक कार्यरत आहेत. त्यात दहशतवादी आघाडीवर आहेत. प्लॅस्टिक बॉम्ब, पेट्रोकेमिकल्ससारख्या स्फोटकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे त्यांचा शोध घेण्याची प्रभावी यंत्रणा हवी. या कार्यशाळेत सुरक्षा यंत्रणा, शास्त्रज्ञ, तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. के. पी. एस. मूर्ती, डायरेक्टर, एचईएमआरएल

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद