शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नोटीसकडे दुर्लक्ष भोवले

By admin | Updated: August 1, 2016 04:30 IST

गैबीनगर भागातील कबीर सेठ यांची इमारत अतिधोकादायक ठरल्याच्या नोटिसा इमारतीच्या मालकाला आणि भाडेकरूंना बजावण्यात आल्या होत्या

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील गैबीनगर भागातील कबीर सेठ यांची इमारत अतिधोकादायक ठरल्याच्या नोटिसा इमारतीच्या मालकाला आणि भाडेकरूंना बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका सात कुटुंबांना बसला आणि त्यात नऊ जणांना जीव गमवावा लागला. यानिमित्ताने भिवंडीसह ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारती, त्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. सकाळी इमारत कोसळताच जवळच्या मशिदीतून परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन सुरू झाले. त्यामुळे परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व पोलिसांना फोन करून घटनास्थळी पाचारण केले. तसेच जेसीबी बोलवून रस्त्यावर पडलेला स्लॅबचा ढिगारा लगेचच बाजूला केला. दोन रुग्णवाहिकांद्वारे जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू केले. मृतदेह हलवण्यासाठी मदत केली. इमारत कोसळली, तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. त्याची तमा न बाळगता तरुणांचे मदतकार्य सुरूच होते. इमारतीखालील यंत्रमाग कारखाना बंद असल्याने त्यामधील कामगार सुरक्षित राहिले.जसजसे ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढले जात होते, तेव्हा परिसरातील नागरिकांना हुंदके फुटत होते. परिसरातील महिलांनीही परिचयाच्या व्यक्तींच्या शोधासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले व रूपेश म्हात्रे, आयुक्त ई. रवींद्रन, ठाणे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भेट दिली. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पोहोचल्यावर त्यांनीही मदतकार्य सुरू केले. दुपारनंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक मागवले होते. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानेही नागरिकांच्या साहाय्याने सुरुवातीचे मदतकार्य सुरू ठेवले होते. दुपारी साडेबारा वाजता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्या आवाजाचा वेध घेऊन जवानांनी त्या चिमुकल्याला बाहेर काढले. तत्पूर्वी जैद अन्सारी या सहा वर्षांच्या मुलाला बाहेर काढून त्याच्यावर उपचार सुरू केले होते. (प्रतिनिधी)>इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दीसर्व जखमींना व मृतांना पाहण्यासाठी, ओळख पटवण्यासाठी, आपल्या परिचयातील व्यक्तींच्या शोधासाठी घटनास्थळी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असताना त्यांचे नातेवाईक फोटो काढू देत नव्हते. इतर कोणासही भेटू देत नव्हते. ढिगारा उपसण्याचे काम अजूनही सुरू असून सायंकाळनंतर नव्याने कोणीही सापडलेले नाही.