शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

मध्ययुगीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची उपेक्षा

By admin | Updated: April 23, 2017 00:49 IST

जागतिक ग्रंथ दिन : राज्यातील संशोधकांना आव्हान; सहा राज्यांत दीड लाख ग्रंथ

संदीप आडनाईक --कोल्हापूर --आधुनिक व उत्तर आधुनिक तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडावर संशोधित झालेल्या अनेक संदर्भांवर आधारित अनेक कथा-कादंबऱ्यांसह इतर संशोधनपर साहित्याच्या पलीकडेही मराठीचे अस्तित्व आहे, यावर चर्चाही न करणाऱ्या ‘मराठीचा बोलु कवतिके’ म्हणणाऱ्या संशोधक-लेखकांकडून मध्ययुगीन कालखंडातील किमान सहा राज्यांत अस्तित्वात असलेल्या १ लाख ४५ हजारांहून अधिक दुर्मीळ मराठी हस्तलिखित ग्रंथ उपेक्षित असल्याचे चित्र ‘जागतिक ग्रंथ दिना’निमित्त समोर येत आहे.ग्रंथ, वेद, व्याकरण, कोशशास्त्र, योग, बौद्ध धर्म, जैन धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य अशा विविध विषयांशी संबंधित अनेक संशोधन ग्रंथ सध्या महाराष्ट्रातील संशोधनपर तसेच इतर खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये संस्कृत, पाली, प्राकृत व इतर भाषांमधील वाङ्मयाचा समावेश आहे; परंतु त्यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांची सध्या वानवा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करणाऱ्यांनी प्रथम मध्ययुगीन कालखंडातील विविध अप्रसिद्ध वाङ्मय प्रकाशात आणले पाहिजे. सध्या बडोदा, तंजावर, पुण्यातील भांडारकर संस्था, धुळ्यातील वि. का. राजवाडे यांच्या नावाची संस्था, बिदर, कल्याण, हैदराबाद, धारवाड, ग्वाल्हेर, इंदौर या ठिकाणी अनेक दुर्मीळ हस्तलिखिते पडून आहेत. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत अनेक दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्यावर अभ्यास करणारे संशोधक नाहीत. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन’चे महाराष्ट्र राज्यासाठीचे केंद्र भांडारकर संस्थेमध्ये हस्तलिखितांच्या नोंदणीचे आणि वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्याचे काम चालते. या संस्थेकडे अठ्ठावीस हजार हस्तलिखितांचा संग्रह आहे. प्राचीन भारताच्या वाङ्मयीन इतिहासात अभिजात भाषा मानल्या जाणाऱ्या प्राकृत आणि पालीसह अर्धमागधी, महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री, इ. प्राकृत भाषांतील साहित्याचे संशोधन अस्पर्शित आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत बाराव्या शतकातील लाखो हस्तलिखित ग्रंथ अजूनही संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी ओरड करणाऱ्या साहित्यिक, प्राध्यापक, लेखक, संशोधकांनी ही माहिती प्रकाशात आणण्याची जबाबदारी घ्यावी.- डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई, हस्तलिखित तज्ज्ञ, केंद्रीय मोडी लिपी समिती सदस्य. अभ्यासकांची वानवाहस्तलिखितांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ संशोधकांची राज्यातच नव्हे, तर देशभरात वानवा आहे. तमिळनाडू युनिव्हर्सिटीतील तंजावरचे डॉ. विवेकानंद गोपाळ, बडोदा येथील डॉ. वाकणकर आणि कोल्हापुरातील मोडी लिपी समितीचे सदस्य डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई आणि डॉ. पा. नां. कुलकर्णी एवढेच हाताच्या बोटांवर मोजता येणारे संशोधक या विषयावर अभ्यास करीत आहेत.कोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास गरजेचाकोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठ, करवीर नगर वाचन मंदिर, शुक्रवार पेठेतील जैन मठ, खासगी मठ, संस्था, मंदिरे तसेच अनेक राजकीय, तसेच राजघराण्यातील व्यक्तींकडे माहितीचा खजिना आहे. त्यांचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.