शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

शिवरायांना खरी आदरांजली वाहायची असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 22:07 IST

शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देण्याची वल्गना करणारी शिवसेना आता सरकारबाहेर पडण्याऐवजी खांदेपालट का करते आहे?

ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 3- शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देण्याची वल्गना करणारी शिवसेना आता सरकारबाहेर पडण्याऐवजी खांदेपालट का करते आहे? शेतक-यांचा विश्वासघात करणा-या या घुमजावासाठी शिवसेनेला नेमका काय मलिदा मिळाला? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
 
संघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी आज पंढरपूर आणि इंदापूर येथील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारवर जोरदार तोफ डागली. शिवसेनेवर हल्लाबोल करताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेने आजवर शिवरायांच्या नावावर राजकारण केले. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज शिवरायांना खरी आदरांजली वाहण्यासाठी सरकारमधून बाहेर पडावे आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केले.
 
शेतक-यांबाबत भाजपच्या दुटप्पी धोरणांचा समाचार घेताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिली. परंतु सरकारमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्ष आपली आश्वासने पाळायला तयार नाही. केवळ इव्हेंट करुन वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले गेले आहे. या सरकारला शेतक-यांची अजिबात कणव नसून त्यामुळेच कर्जमाफीसाठी टाळाटाळ सुरु आहे.
 
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांची संयुक्त संघर्ष यात्रा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. वेळ पडल्यास संपूर्ण राज्यभरातील शेतकरी एकाच दिवशी रस्त्यावर उतरुन सरकारला आपली ताकद दाखवून देईल, असेही सूतोवाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसीम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.
 
दरम्यान संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी आज सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला सद्बुद्धी घालण्याचे साकडे घातले.