शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा- राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:42 IST

सहकार हे बलस्थान तसेच भ्रष्टाचारामुळे ठरले वैगुण्य; राज्यपालांचे प्रतिपादन

कल्याण : सहकार चळवळ ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा, असे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात बोलले जाते. मात्र, सहकार चळवळ हे जसे महाराष्ट्राचे बलस्थान आहे, त्याचप्रमाणे वैगुण्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.कल्याण जनता सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या संचालक सेवा पुरस्कार वितरण व बँकेचा वर्धापन दिन सोहळा के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी उपरोक्त विधान केले. राज्यपालांचे हे विधान विद्यमान सत्ताधारी पक्षांना कानपिचक्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खासदार कपिल पाटील, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, संचालक सेवा पुरस्कार न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, बँकेचे उपाध्यक्ष मधुसूदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कोश्यारी म्हणाले की, मुंबईतील बड्या बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे जनतेमधील विश्वास कमी होत चालला आहे. देशात प्रत्येक जागी भ्रष्टाचार होत आहे. अशा परिस्थितीत सहकार आणि सरकारपेक्षा जास्त महत्त्वाचे संस्कार आहेत. संस्कारी कामांतूनच जनतेत कमी झालेला विश्वास पुन्हा संपादन करणे शक्य होईल, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्यासाठी जनतेसमोर चांगल्या संस्कारी कामांचे उदाहरण ठेवावे लागेल. चांगल्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता आहे, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर बँकेने सामाजिक बांधीलकीतून १० हजार झाडे लावली आहेत, अशी माहिती देण्यात आली असली तरी बँकेच्या भागधारकांची संख्या ५५ हजार आहे. त्यामुळे प्रत्येक भागधारकाने एक झाड लावल्यास ५५ हजार झाडे लावू शकता. ती जगविण्याची जबाबदारीही घेऊ शकता, असे आवाहन राज्यपालांनी बँकेला केले.बँकेची उलाढाल पाच हजार कोटी रुपये आहे. येत्या काळात बँकेच्या उलाढालीचे लक्ष्य १० हजार कोटी रुपयांचे ठेवण्यात यावे. लक्ष्य मोठे ठेवल्यास ते गाठण्यासाठी सगळे काम करतात. बँकेचा नफा जास्त झाल्यावर बँकेकडून जास्त प्रमाणात लाभांशाची रक्कम सामाजिक कार्यावर खर्च केली जाईल. आता सध्या बँकेकडून दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या रकमेत वाढ करण्यात यावी, जेणेकरून समाजकार्यात बँकेचा अधिक हातभार लागेल, अशी सूचनाही राज्यपालांनी बँकेला केली.पुरस्कारांचे वितरणराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते संचालक सेवा पुरस्काराने हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी व उद्योजक कृष्णलाल धवन यांना सन्मानित करण्यात आले. बँकेने पुरस्कार स्वरूपात उभयतांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, या दोन्ही सत्कारमूर्तींनी ही रक्कम पुन्हा संचालक सेवा पुरस्कार न्यासाच्या सामाजिक कार्यासाठी दिली.संचालक सेवा पुरस्कार उद्योजक महेश अग्रवाल यांनाही देण्यात येणार होता. मात्र, त्यांच्या मातोश्रींचे अलीकडेच निधन झाल्याने ते पुरस्कार कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी त्याचा संदेश पाठविला होता. हा संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष पाटील यांनी केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी