शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा- राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:42 IST

सहकार हे बलस्थान तसेच भ्रष्टाचारामुळे ठरले वैगुण्य; राज्यपालांचे प्रतिपादन

कल्याण : सहकार चळवळ ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा, असे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात बोलले जाते. मात्र, सहकार चळवळ हे जसे महाराष्ट्राचे बलस्थान आहे, त्याचप्रमाणे वैगुण्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.कल्याण जनता सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या संचालक सेवा पुरस्कार वितरण व बँकेचा वर्धापन दिन सोहळा के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी उपरोक्त विधान केले. राज्यपालांचे हे विधान विद्यमान सत्ताधारी पक्षांना कानपिचक्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खासदार कपिल पाटील, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, संचालक सेवा पुरस्कार न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, बँकेचे उपाध्यक्ष मधुसूदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कोश्यारी म्हणाले की, मुंबईतील बड्या बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे जनतेमधील विश्वास कमी होत चालला आहे. देशात प्रत्येक जागी भ्रष्टाचार होत आहे. अशा परिस्थितीत सहकार आणि सरकारपेक्षा जास्त महत्त्वाचे संस्कार आहेत. संस्कारी कामांतूनच जनतेत कमी झालेला विश्वास पुन्हा संपादन करणे शक्य होईल, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्यासाठी जनतेसमोर चांगल्या संस्कारी कामांचे उदाहरण ठेवावे लागेल. चांगल्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता आहे, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर बँकेने सामाजिक बांधीलकीतून १० हजार झाडे लावली आहेत, अशी माहिती देण्यात आली असली तरी बँकेच्या भागधारकांची संख्या ५५ हजार आहे. त्यामुळे प्रत्येक भागधारकाने एक झाड लावल्यास ५५ हजार झाडे लावू शकता. ती जगविण्याची जबाबदारीही घेऊ शकता, असे आवाहन राज्यपालांनी बँकेला केले.बँकेची उलाढाल पाच हजार कोटी रुपये आहे. येत्या काळात बँकेच्या उलाढालीचे लक्ष्य १० हजार कोटी रुपयांचे ठेवण्यात यावे. लक्ष्य मोठे ठेवल्यास ते गाठण्यासाठी सगळे काम करतात. बँकेचा नफा जास्त झाल्यावर बँकेकडून जास्त प्रमाणात लाभांशाची रक्कम सामाजिक कार्यावर खर्च केली जाईल. आता सध्या बँकेकडून दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या रकमेत वाढ करण्यात यावी, जेणेकरून समाजकार्यात बँकेचा अधिक हातभार लागेल, अशी सूचनाही राज्यपालांनी बँकेला केली.पुरस्कारांचे वितरणराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते संचालक सेवा पुरस्काराने हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी व उद्योजक कृष्णलाल धवन यांना सन्मानित करण्यात आले. बँकेने पुरस्कार स्वरूपात उभयतांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, या दोन्ही सत्कारमूर्तींनी ही रक्कम पुन्हा संचालक सेवा पुरस्कार न्यासाच्या सामाजिक कार्यासाठी दिली.संचालक सेवा पुरस्कार उद्योजक महेश अग्रवाल यांनाही देण्यात येणार होता. मात्र, त्यांच्या मातोश्रींचे अलीकडेच निधन झाल्याने ते पुरस्कार कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी त्याचा संदेश पाठविला होता. हा संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष पाटील यांनी केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी