शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही पाणी तोडा, आम्ही दूध-भाजी बंद करतो

By admin | Updated: April 27, 2017 02:05 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली

शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली, बुधवारी शहापूरजवळील चेरपोली येथे रास्तारोको करण्यात आले. यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. ‘तुम्ही मुंबईचे पाणी तोडा, आम्ही भाजीपाला-दूध बंद करतो,’ अशी चिथावणीखोर भाषा सरकारमध्ये सामील असलेल्या खासदार शेट्टी यांनी या वेळी केली.जमीन बचाव संघर्ष समितीचे विश्वनाथ पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, माजी खासदार सुरेश टावरे, आनंद ठाकूर, गोटीराम पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ‘रास्तारोको’ आंदोलनात सहभाग घेतला. नेत्यांची भाषणे झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. यापुढील आंदोलन हे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक केले जाईल, असे शेट्टी यांनी जाहीर केले. आंदोलनाच्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवली होती. खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सहभागी शेतकरी ‘जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘ये तो अंगडाई है,आगे तो लढाई है’ अशा घोषणा देत होते. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या महामार्गाकरिता ६० एकर जमीन संपादित करून, राज्य सरकार ठेकेदार आणि दलालांची समृद्धी करायला निघाले आहे. जी मंडळी सरकारमध्ये बसली आहेत, ती शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यांनी जमीन संपादनाकरिता शेतकऱ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे सांगताना खा. शेट्टी म्हणाले की, सरकारच्या खिशात दमडी नसताना, हे समृद्धी महामार्ग बनवायला निघाले आहेत. पक्षीय राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करायला हवा. स्वाभिमान संघटनेची संपूर्ण फौज शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शहापूरच्या शेतकऱ्यांनो, तुम्ही मुंबईचे पाणी तोडा, आम्ही दूध,भाजीपाला बंद करतो, मग बघा, सरकार कसे वठणीवर येते, असा इशारा त्यांनी दिला. आजचे आंदोलन फक्त सरकारला इशारा देण्यासाठी होते, यापुढे शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा पद्धतीने सरकार बेसावध असताना आंदोलन करू, असे शेट्टी म्हणाले.महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांमधील ३५० गावे या महामार्गामुळे बाधित होणार असल्याचा दावा संघर्ष समितीचे निमंत्रक विश्वनाथ पाटील यांनी केला. महामार्ग पूर्ण करण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करून, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांचा बालहट्ट पूर्ण करण्याकरिता हा महामार्ग उभारण्यात येत असल्याचा आरोप आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला.या आंदोलनात शहापूर, कल्याण, भिवंडी तालुका संघर्ष समिती, किसान सभा, तसेच नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर परिसरांतील संघर्ष समितीचे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष आदींचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)‘समृद्धी’च्या विरोधात सेना-शेट्टी एकत्र!मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनी गमवाव्या लागत असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात आम्हाला साथ द्या, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून केली. मातोश्रीवरीलया भेटीत सहकार्य करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले, अशी माहिती खा. शेट्टी यांनी लोकमतला दिली. शेतकरी, आदिवासींना महामार्गासाठी भूमिहीन केले जात असल्याच्या मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. शेट्टी म्हणाले, आंदोलन तसेच शेतकरी कर्जमुक्ती, तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. केंद्र व राज्य सरकारला शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रसंगी सरकारविरुद्ध एकत्र भूमिका घेण्याचे ठरले, अशी माहिती खा.शेट्टी यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)