शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

बोललो असतो तर भारत हादरला असता- एकनाथ खडसे

By admin | Updated: June 29, 2016 20:34 IST

आपल्यावरील आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता असे सूचक वक्तव्य भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करुन माजी मंत्री एकनाथराव खडसे

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २९ : आपल्यावरील आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता असे सूचक वक्तव्य भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करुन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी येथे खळबळ उडून दिली. या बैठकीस अनुपस्थित असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही त्यांनीे चिमटे काढले. याच बैठकीत शिवसेना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व प्रीती मेनन यांचासुद्धा निषेध करण्यात आला. शहरातील संत बाबाहरदासराम मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीस पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी अध्यक्षस्थानी होते. नेहमी शिस्तीत होणारी बैठक आज मात्र प्रचंड घोषणाबाजी व गोंधळाने गाजली.

प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी यांच्या भाषणातही वारंवार व्यत्यय आणला जात होता. खडसे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत आपल्यावर एकही आरोप की आक्षेप नव्हता. मग आताच काय झाले? एकाच दिवसात नाथाभाऊ कसा बिघडला? शिखंडीला केले पुढे न खंजीर से डरता हू न तलवार से, मै लढता आया हू लढता रहूंगा. .ख्वाईश ये है की दुष्मन खांदानी मिले.. मगर मिले तो गैरखांदानी.. असा शेर ऐकवून ते म्हणाले, तरीही मी हार मानत नाही, म्हणून ‘शिखंडीला’ पुढे केले असे सांगून आपल्यावर झालेल्या विविध आरोपांचा पुनरुच्चार करून ते म्हणाले,

पुरावा द्या.

पुरावा दिल्यास केवळ मंत्रिपदच नाही तर राजकारण सोडतो पण पुरावे देऊ न शकल्यास तोंड काळे करा असे आपण नेहमीच विरोधकांना आव्हान दिले, परंतु ही मंडळी एकही पुरावा देऊ शकलेली नाही. त्यामुळे हे ठरवून केलेले काम आहे, असा आरोप त्यांनी केला. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याच्या निषेधाचा ठराव जोरदार घोषणा देत मांडण्यात आला. तसेच पुरावे नसताना आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रीती मेनन यांचाही यावेळी निषेध करण्यात आला.