शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:13 IST

१६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका असं झिरवाळ म्हणाले.

मुंबई – आम्हाला घटनेने जे आरक्षण दिलंय ते ४७ जातींना दिले. त्यात ४८ वा कोण मान्य करेल? समाजाने आमच्यावर रोष व्यक्त केला. तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या. आम्ही पक्षप्रमुखांकडे राजीनामा देऊ. कुणाला किती आरक्षण द्यायचे हे सरकारने ठरवावे पण आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नाही यासाठी आम्हाला काहीही करायची वेळ आली तरी आम्ही करू असा इशाराच विधानसभेचे उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिला आहे.

नाना झिरवाळ म्हणाले की, आदिवासी समाजाच्या प्रमाणपत्रावर निवडून आलेले सर्व आमदार राजीनामा देतील. २५ आमदार आहेत. पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा दिला, तरी एकाच पत्रावर राजीनामा लिहू आणि देऊन टाकू. आम्ही २५ जणांनी मनावर घेतले तर कुठलेही सरकार राहत नाही. हा घरचा आहेर नाही, आम्ही सरकारमध्ये असू पण सरकार आणि आमदार नंतर, सर्वात पहिले आमचा समाज, आदिवासी, मी आदिवासी नसतो तर आम्ही आमदार झालो असतो असं वाटते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच २५ आमदार गेले तर जा असं कुठला पक्ष म्हणेल, कारण आम्ही २५ आमदार असलो तरी प्रत्येक मतदारसंघात ५० हजारांच्या वर आदिवासी मतदार आहेत असंही त्यांनी म्हटलं.

तसेच लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. कुठे सभा, आंदोलन घ्यावीत हा त्यांचा हक्क आहे. धनगर आहे की धनगड यापेक्षा आम्ही ४७ जाती आदिवासी आहोत. लोकं आता खुळी राहिली नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. धनगर हे मेंढपाळ आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात कुठलेही साम्य नाही. रुढी, परंपरा ताळमेळ नाही असंही नाना झिरवाळ यांनी म्हटलं.

१६ आमदारांच्या अपात्रेवर बोलणं टाळलं

अपात्रतेविषयी नका काढू, विधानसभा अध्यक्ष म्हटलेत, जो निर्णय असेल ते घेतील, ते कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे चुकीचा निर्णय घेणार नाहीत असं झिरवाळ यांनी म्हटलं. त्यावर पत्रकारांनी तुम्ही १६ आमदार अपात्र होतील असं ठामपणे सांगत होता, त्यावर तेव्हाचे तेव्हा, आत्ताचे आज समाजाबद्दल बोलणार, १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करायचे नाही. १६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका. उपाध्यक्षांचा विषय येत नाही असं म्हणत झिरवाळ यांनी अपात्रतेवर बोलणे टाळले.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळDhangar Reservationधनगर आरक्षण